शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
3
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
4
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
5
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
6
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
7
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
8
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
9
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
10
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
11
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
12
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
13
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
14
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
15
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
16
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
17
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
18
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
19
"पहिल्या सीझनला मला स्पर्धक म्हणून ऑफर होती", केदार शिंदेंचा खुलासा; म्हणाले, 'शो स्क्रीप्टेड...'
20
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये तीन दिवसांत महिन्याचा पाणीसाठा

By admin | Published: July 05, 2016 4:29 AM

पावसाने शुक्रवार ते रविवार या काळात तलाव क्षेत्रात जोरदार हजेरी लावल्यामुळे अवघ्या तीन दिवसांत मुंबईच्या धरणांमध्ये महिन्याभराचा पाणीसाठा वाढला आहे़ हा साठा एकूण जलसाठ्याच्या

मुंबई/ठाणे : पावसाने शुक्रवार ते रविवार या काळात तलाव क्षेत्रात जोरदार हजेरी लावल्यामुळे अवघ्या तीन दिवसांत मुंबईच्या धरणांमध्ये महिन्याभराचा पाणीसाठा वाढला आहे़ हा साठा एकूण जलसाठ्याच्या १५ टक्केच आहे़ मात्र पाणीटंचाईच्या काळात ही वाढही दिलासा देणारी आहे़जून महिना संपत आला तरी पावसाळी ढग तलाव क्षेत्रात फिरकत नव्हते़ त्यामुळे तलावांची पातळी दिवसेंदिवस खालावत होती़ मुंबईत पाऊस जोरदार असला तरी तलाव क्षेत्र मात्र कोरडेच राहत होते़ मात्र वीकेण्डच्या पावसाने चित्र पालटले. पाऊस सुरू झाल्यापासून तलाव क्षेत्रातील जलसाठा रोज २० ते ३० हजार दशलक्ष लीटरने वाढला होता़ गेल्या तीन दिवसांमध्ये तलावांत तब्बल एक लाख १७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा वाढला़ यामुळे ३२ दिवसांचा पाणीसाठा तयार झाला. वर्षभर आवश्यक पाण्याच्या तो १५ टक्केच असून, पाणीकपात कायम राहील.ठाणे-पालघरलाही दिलासाठाणे, पालघर जिल्ह्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणीसाठ्यात तिपटीने वाढ झाली आहे. ठाणे जिल्ह्यात धरणांच्या क्षेत्रात गेल्या २४ तासांत ७३७ मिमी पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस सूर्या धरणात, तर सर्वांत कमी पाऊस उल्हास नदीच्या खोऱ्यातील आंध्रा धरणात झाला आहे. बारवी धरणातील साठाही वाढला आहे. (प्रतिनिधी)- मुंबईला दररोज 3750दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो़. - गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यापासून मुंबईत पाणीकपात सुरू झाल्याने रोज ३२५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे़- मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी धरणांमध्ये १ आॅक्टोबरअखेर १४ लाख दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे़असा वाढला जलसाठा १ जुलै १ लाख १० हजार २ जुलै १ लाख १९ हजार३ जुलै १ लाख ५७ हजार४ जुलै २ लाख २७ हजार(दशलक्ष लीटरमध्ये)