शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
2
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
3
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
4
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
5
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
6
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
7
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
8
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
9
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
10
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
12
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
13
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
14
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
15
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
16
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
17
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
18
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
19
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
20
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर

मुंबईत १५ ते २० मिनिटेच पाणी तुंबेल : पालिका

By admin | Published: May 21, 2016 2:18 AM

पालिका प्रशासनाने मात्र यंदाच्या पावसाळ्यात १५ ते २० मिनिटेच पाणी तुंबेल, असा दावा शुक्रवारी केला़

मुंबई : नालेसफाईवरून राजकीय कलगीतुरा रंगला असताना पालिका प्रशासनाने मात्र यंदाच्या पावसाळ्यात १५ ते २० मिनिटेच पाणी तुंबेल, असा दावा शुक्रवारी केला़ तसेच पाणी तुंबण्याची संवेदनशील ठिकाणेही ४० वरून तीनवर आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे़नालेसफाईच्या कामावरून राजकीय चिखलफेक सुरू आहे़ विरोधकांनी पोलखोल करण्याचा इशारा दिल्यामुळे सत्ताधारी शिवसेनेने पाणी तुंबल्यास पालिका प्रशासनालाच जबाबदार धरून आपला बचाव केला आहे़ नालेसफाईवरून चर्चेचा गाळ उडत असल्याने अखेर पालिका प्रशासनाने आज मौन सोडून आपली बाजू पत्रकार परिषदेतून मांडली़मुंबईत या वर्षी एक महिन्याआधीच म्हणजे १५ मार्च रोजी नाल्यांमधील गाळ काढण्यास सुरुवात झाली आहे़ त्यानुसार आतापर्यंत मुख्य नाल्यांमधील ६६ टक्के तर वॉर्डमार्फत सुरू असलेल्या छोट्या नाल्यांची सफाई ३५ टक्के झाल्याचा दावा अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी केला़ >पाणी तुंबण्याची ठिकाणे अवघी तीनपावसाळ्यात मुंबईत ४० ठिकाणी हमखास पाणी साचत होते़ या ठिकाणांना संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आले होते़ मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पालिकेने केलेल्या उपाययोजनांमुळे आता केवळ हिंदमाता, सायन रोड क्ऱ २४ आणि नायर रुग्णालयाचे प्रवेशद्वार येथेच पाणी तुंबण्याची शक्यता आहे, असा दावा पालिका प्रशासनाने केला़हिंदमाता पूरमुक्त करण्यासाठी बांधलेले ब्रिटानिया पंपिंग स्टेशन ३१ मेपासून कार्यान्वित होणार आहे़मुंबईत पावसाचे पाणी उपसण्यासाठी २९३ पंप लावण्यात येणार आहेत़>पाणी तुंबणार, मात्र १५ मिनिटेचताशी २५ मि़मी़ पावसाचे पाणी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता ताशी ५० मि़मी़पर्यंत वाढविण्यात आली आहे़ त्यापुढे पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढू शकत नाही़ मात्र मोठ्या लाटा आणि मुसळधार पावसामुळे मुंबईत पाणी तुंबले तरी ते १५ ते २० मिनिटेच तुंबेल, असा दावा देशमुख यांनी केला आहे़>छोट्या नाल्यांच्या सफाईत अडथळाछोट्या नाल्यांच्या सफाईसाठी मागविलेली निविदा ३०० टक्के जादा दराने आल्या होत्या़ दुसऱ्या वेळीच दोनशे आणि त्यानंतर ८० टक्के जादा दराच्या निविदा आल्यामुळे अखेर पालिका आयुक्त अजय मेहता यांनी विभागस्तरावरच कामगारांमार्फत छोट्या नाल्यांची सफाई सुरू केली़ यामुळेच आतापर्यंत ३५ टक्केच नाले साफ झाले आहेत़गाळ टाकण्यासाठी पालिकेची जागानाल्यांमधील गाळ टाकण्यासाठी डम्पिंग ग्राउंड उपलब्ध नसल्याने गेली तीन ते चार वर्षे पालिकेची मोठी अडचण निर्माण झाली होती़ मुंबईशेजारील गावांमध्येही पालिकेने जागा देण्याची विनंती केली़ मात्र अन्य महापालिकांनी नकारघंटाच वाजवली़ त्यामुळे ठेकेदारांनाच गाळ टाकण्याची जागा शोधण्यास बंधनकारक करण्यात आले होते़ यामुळेच घोटाळा करण्याची संधी ठेकेदारांना मिळाली़ बनावट प्रमाणपत्र दाखवून गाळ मुंबईबाहेर नेल्याचे ठेकेदार भासवत होते़ त्यामुळे पालिकेने या वर्षी नाल्यांमधील गाळ टाकण्यासाठी ठाणे जिल्ह्यात नऊ डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था केली आहे़