शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंद दिघे यांना मारले होते, त्यांचा घातपात झाला होता; संजय शिरसाठ यांचा गंभीर आरोप
2
मुंबईत हायअलर्ट! धार्मिक स्थळे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; पोलीस सतर्क, चोख बंदोबस्त
3
काँग्रेसच्या कटकटी थांबेना! जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे शैलजा-सुरजेवालांची पाठ
4
Tarot Card: देवीच्या आशीर्वादाने नवरात्रीचे चैतन्य अनुभवायला सज्ज व्हा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
5
'या' सरकारी कंपनीला १०० कोटी रुपयांची ऑर्डर; Adani समूहासाठी करणार काम
6
महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
7
Exclusive: दीड वर्षाच्या मुलासोबत कसं केलं शूट? प्रिया बापटने सांगितली 'रात जवां है'च्या सेटवरची धमाल-मस्ती
8
Sarva Pitru Amavasya 2024 : सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करायचे, पण सूर्य ग्रहणामुळे टाळा 'ही' वेळ!
9
निर्मला सीतारामन यांच्याविरोधात FIR दाखल करा; न्यायालयाचे आदेश, खंडणी प्रकरण काय?
10
"फायनलपर्यंत कोणती रास जाईल?"; राशीचक्रकार शरद उपाध्येंनी दिलं भन्नाट उत्तर
11
‘वंदे भारत’चा जगात डंका! ३ देशांकडून आग्रही मागणी, ‘या’ वैशिष्ट्यांमुळे ठरते वेगळी
12
मुलानं खरेदी केलं कोट्यवधीचं घड्याळ; मंत्री असलेल्या बापावर आली वाईट वेळ, काय घडलं?
13
"आम्ही योग्य बँकर निवडला नाही..," Paytm च्या फ्लॉप IPO वर शर्मा यांनी सांगितली कुठे झाली चूक
14
ENG vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव हाणून पाडला; इंग्लंडच्या बाजूने निर्णय लागला, इंग्लिस ट्रोल
15
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
16
पितृपक्ष: घरात पुरुष नाही, मग श्राद्ध कुणी करावे? महिलांना आहे का अधिकार? शास्त्र सांगते...
17
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
18
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
19
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
20
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर

सासवडला जुलैअखेरपर्यंत पाणी

By admin | Published: May 21, 2016 1:12 AM

जुलै महिनाअखेर पुरेल इतका उपयुक्त पाणीसाठा वीर जलाशयात शिल्लक असल्याने सासवडकरांना पाणीटंचाई भासणार नाही

सासवड : जुलै महिनाअखेर पुरेल इतका उपयुक्त पाणीसाठा वीर जलाशयात शिल्लक असल्याने सासवडकरांना पाणीटंचाई भासणार नाही, अशी माहिती नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप व पाणीपुरवठा सभापती सुहास लांडगे यांनी दिली. वीर धरण पाणीपुरवठा योजनेची व वीर धरणातील पाणीसाठ्याची समक्ष पाहणी नगराध्यक्षांनी केली. या वेळी उपनगराध्यक्ष व पाणीपुरवठा समितीचे सभापती सुहास लांडगे, नगरसेवक अजित जगताप, मनोहर जगताप, पाणी विभागाचे ज्ञानेश्वर गिरमे उपस्थित होते. वीर धरणात सध्या अंदाजे दीड टीएमसी पाणी शिल्लक आहे. सासवडच्या पाणीपुरवठा योजनेच्या चारीमध्ये १० फुट पाणी आहे; त्यामुळे पाणी कमी पडणार नाही. जर धरणाच्या कालव्यातून पाणी सोडले व योजनेच्या चारीखाली पाणी गेले, तर पाणी जॅकवेलमध्ये आणण्यासाठी पालिकेने यंत्रणा सज्ज ठेवली आहे. सध्या केवळ वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास व या भागात वादळ झाल्याने वीजपुरवठा खंडित न झाल्यास पाणी पुरवठ्यात अडथला जाणवणार नाही. वीजपुरवठा खंडित झाला तर मात्र थोडी अडचण होऊ शकते. त्यामुळे आवश्यक असणारे पाणी पंपिंग करून दोन दिवसाआड पाणी पुरविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा व्यवस्थित पार पडेल, असे नियोजन केले असल्याची माहिती नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप व पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष सुहास बापू लांडगे यांनी दिली. सासवड शहरास रोज ५५ ते ६० लाख लिटर पाण्याची गरज लक्षात घेऊन वीजपुरवठ्यावर अवलंबून असलेली योजना सलग दोन दिवस पाणी उचलून साठवण टाक्यात ठेवले जाते. सकाळी-रात्री अशा दोन वेळेत बंद नळाद्वारे पाणी देण्यात येते. सासवड शहराला गराडे, घोरवडी व वीर धरणांतून पाणीपुरवठा होत होता. परंतु, तालुक्यातील टंचाईची परीस्थित लक्षात घेत व या जलाशयावर असणाऱ्या इतर गावांच्या पाणी योजनेसाठी पाणीपुरवठा व्हावा म्हणून गराडे व घोरवडीतील पाणी सासवडला देणे बंद आहे. (वार्ताहर)