शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

जळगावातील ‘मारवड विकास मंच’चा जलसंधारणाचा स्तुत्य उपक्रम

By admin | Published: July 04, 2017 8:38 AM

मारवड विकास मंच : परिसराचा भौगोलिक व शैक्षणिक विकासासाठी तरुणाईची साद

 
संजय पाटील/ऑनलाइन लोकमत 
जळगाव(अमळनेर), दि. 4 - ओढ लावती अशी जीवाला गावाकडची माती.... साद घालती पुन्हा नव्याने ती रक्ताची नाती.... या गाण्यातील ओळींप्रमाणेच तरुणांना गावाने ओढ लावली आणि ओढीतून या तरुण रक्ताने युवा पिढी काय करु शकते... हे दाखवून दिले. शिवाय गांधीजींच्या खेड्याकडे चला... या वाक्याप्रमाणे कार्यही केले आणि त्यात त्यांना यशही मिळाले. 
यशाची ही कहाणी आहे मारवड (ता. अमळनेर जि. जळगाव) येथील शिक्षण घेतलेल्या आणि सध्या नोकरीनिमित्त बाहेरगावी अर्थात शहरात असलेल्या तरुणांची. गावासाठी ही तरुण मंडळी एकत्र आली. नंतर मग या ‘मारवड विकास मंच’ असे या गृपचे नामकरण झाले.
 
डिसेंबर २०१४ मध्ये मारवड येथील शिकलेले व बाहेरगावी नोकरीला असलेले १२० तरुण एकत्र आले. ‘गावाकडे चला’ हे ध्येय उराशी बाळगून मूळ म्हणजे ‘रूट (रिटर्न टू ओरिजिन अ‍ॅण्ड ऑर्गनाईज ट्रान्सफॉर्मेशन) या ओबडधोबड संकल्पनेतून प्रत्येकाने १०० रुपये महिना याप्रमाणे १२०० रुपये प्रतिवर्ष जमवण्याचे ठरवले. यातून शेतकरी व कष्टकऱ्यांसाठी जलसंधारणाची कामे करण्याचे ठरवण्यात आले. 
 
२ जुलै २०१५ रोजी ‘मारवड विकास मंच’ची स्थापना झाली आणि मंचची सदस्य संख्या १२० वरून थेट २५० वर पोहोचली. आपण वाढलो, शिकलो, त्या गावाच्या आणि परिसराच्या ऋणातून उतराई होण्यासाठी कोणती कामे करू शकतो, याचे सर्वेक्षण या युवकांनीच केले. शिरपूर पॅटर्नचे डॉ. सुरेश खानापूरकर व साताऱ्याचे डॉ.अविनाश पोळ यांचे मार्गदर्शन घेऊन ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.
 
नाला खोलीकरणासाठी अमळनेरचे आमदार शिरीष चौधरी यांनी मशीन, डिझेलची मदत केली. कामांसाठी पैसा अपूर्ण पडू लागल्यानंतर बजाज ऑटो आणि केअरिंग फ्रेण्ड्स मुंबई या संस्थांकडे निधीसाठी प्रस्ताव पाठवला. कामांची प्रगती पाहून दोन्ही संस्थांनी अनुक्रमे ३० लाख व १० लाख रुपये निधी दिला. त्यात माळण नदीचे पुनर्जीवन करण्यात आले. दोन कि.मी.लांब, तीन मी.खोल व २४ मी.रुंद असे खोलीकरण करून ३०० ते ४०० मीटर अंतरावर सात टप्पे तयार करण्यात आले. यात सात कोटी लिटर पाणी साठा साचणार आहे. 
 
त्यानंतर गावातीलच काही अधिकाऱ्यांची मदत घेऊन माळण नदीचा २७ कि.मी.चा ‘डांगर ते डांगरी’ असा आराखडा शासनाला सादर करण्यात आला. शासनाने लोकसहभागाची दखल घेत १० कोटींचा निधी उपलब्ध करुन दिला. यात आठ बंधाऱ्यांचे काम प्रगतीपथावर आहे. डांगरी-कळमसरा रस्ता, वावडे हनुमान मंदिर, मारवड गावठाण, धानोरा, जैतपीर, गलवाडे या ठिकाणी बंधाऱ्यांचे काम सुरू आहे.
 
एका बंधाऱ्यामुळे १० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा फायदा होणार आहे. तांबोळ्या नाल्याचे साडेसात कि.मी. खोलीकरण करण्यात आले. दोन मीटर खोली, तीन मी. रुंदी अशा परिमाणात लघुजलसंधारण व कृषी विभागातर्फे प्रत्येकी तीन, तीन बंधारे बांधण्यात आले. यातून एकूण २५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. 
 
मारवड आरोग्य केंद्रासमोर शेतशिवारातून येणाऱ्या नैसर्गिक प्रवाहाला थांबवून तिथे ९० बाय १०० फूट तलाव खोलीकरण करून १५ फूट उंचीचे बांध बांधण्यात आले. पाणी पाझरू नये, यासाठी पॉलिथिन पेपर, काळीमाती दगड पिचिंग करून पाणी साठवण्यात येणार आहे. या कामासाठी विप्रो कंपनीकडून १२ लाख रुपये मिळाले आहेत.
 
शैक्षणिक विकास
जलसंधारणाच्या माध्यमातून मारवड व परिसरासोबत शैक्षणिक बदलासाठीही विकास मंचच्या तरुणांनी प्रयत्न सुरु केले आहेत. यात शाळेसाठी रंगरंगोटी, सौर पॅनल, शौचालय बांधकाम, संगणक व विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे तालुक्यातील जि.प.च्या २७ शाळांना ई-लर्निंग कीट, एल.सी.डी. प्रोजेक्टर देण्यात आले. जि.प.शाळेत कुंपण, रंगमंच बांधण्यात आला. यासाठी आमदार चंद्रकांत रघुवंशी (नंदुरबार) , विक्रम टी, बजाज आॅटो यांचे सहकार्य लाभले.
या उपक्रमांची दखल शासनाने घेतली. या ‘मारवड विकास मंच’ला वसंतराव नाईक राज्यस्तरिय जलसंधारण पुरस्कार जाहीर झाला आहे. 
 
विरोध करण्याचा प्रयत्न 
या कामाच्या वेळी गावातील काही जणांनी विरोधही केला. या विरोधात मागे न हटता या तरुणांनी खोलीकरणातून निघालेला मुरूम शेतशिवार रस्त्यांवर टाकून रस्ते बनवले आणि गाळ शेतीत टाकल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. 
 
वृक्ष लागवड ते स्वच्छता 
एवढ्यावरच न थांबता या युवकांनी एक घराजवळ एक याप्रमाणे ४०० झाडे ट्री-गार्डसह लावली. त्यात २५० झाडे जगली. तसेच परिसरात शेतांमध्येही प्रत्येकी एकप्रमाणे दोन हजार झाडे लावली. गावात स्वच्छतेसाठी कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. तसेच तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा, लायब्ररीची सुविधा करण्यात आली आहे.