शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
3
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
4
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
5
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
7
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
8
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
9
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
10
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
11
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
12
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
13
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
14
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
15
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
16
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
17
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
18
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
19
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
20
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!

रेसमध्ये आम्हीच पुढे! बारावीचा निकाल ९३.३७%; २.१२% वाढली यंदा उत्तीर्णाची संख्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 06:18 IST

परीक्षेला बसलेल्या १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांपैकी १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. निकालात यंदा कोकण विभाग आघाडीवर राहिला, तर मुंबईचा शेवटचा क्रमांक लागला.

मुंबई /पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये झालेल्या बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यंदा बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला असून गतवर्षीच्या तुलनेत त्यात २.१२ टक्के वाढ झाली आहे. परीक्षेला बसलेल्या १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांपैकी १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. निकालात यंदा कोकण विभाग आघाडीवर राहिला, तर मुंबईचा शेवटचा क्रमांक लागला.६,९८६ दिव्यांग विद्यार्थ्यांपैकी ६ हजार ५८१ म्हणजेच ९४.२० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ४० हजार ७९५ खासगी विद्यार्थ्यांपैकी ३४ हजार ९८८ (८५.७६%), तर ४५ हजार ०८३ पुनर्परीक्षार्थींमधून २२ हजार ४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळातील वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी तनिषा बाेरामणीकर हिने ६०० पैकी ६०० गुण घेत बारावीच्या निकालात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तनिषाला लेखी परीक्षेत ६०० पैकी ५८२ गुण आणि खेळाचे १८ गुण असे एकूण ६०० गुण मिळाले. १०० टक्के घेणारी तनिषा कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतून एकमेव असल्याचेही स्पष्ट झाले.

नाउमेद होऊ नका; पुन्हा परीक्षेची तयारी करापुणे : बारावीच्या परीक्षेत यशस्वी झालेले सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे अभिनंदन. जे विद्यार्थी यशस्वी झाले नाहीत त्यांनी नाउमेद हाेऊ नये. ही परीक्षा म्हणजे जीवनाची अंतिम परीक्षा नाही त्यामुळे निराश न हाेता पुढील परीक्षेसाठी चांगली तयारी करावी, असे आवाहन राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी केले.यंदा प्रात्यक्षिक आणि अंतर्गत परीक्षेचे गुण ओएमआर शीटवर न घेता ऑनलाइन पोर्टलद्वारे घेतल्याने निकाल लवकर जाहीर करता आल्याचे ते म्हणाले.

मुंबईचा निकाल ३.८२ टक्क्यांनी वाढला तरी... इतर विभागीय मंडळांच्या तुलनेत मुंबई विभागीय मंडळाचा बारावीच्या निकाल सर्वांत तळाला असला तरी त्यामध्ये ३.८२ टक्क्यांची वाढ झाली आहे. 

गेल्या वर्षी ८८.१३% असलेला मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमधील विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या या विभागाचा निकाल यंदा ९१.९५% आहे.

यंदाही मुलींचीच बाजीराज्यात बारावी परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली. उत्तीर्ण होणाऱ्या मुलींचे प्रमाण ९५.४४, तर मुलांचे ९१.६० टक्के आहे. मुलींचा निकाल ३.८४ टक्के जास्त आहे.

विद्यार्थ्यांना किती गुण? ८,७८२     ९०% १,९०,५७०    ७५% ४,८०,६३१    ६०% ५,२६,४२५    ४५% १,३२,०५८    ३५ ते ४५% 

बारावी परीक्षेला बसलेले विद्यार्थीमुले : ७,६६,६५१उत्तीर्ण : ७,०२,२९६मुली : ६,५७,३१९उत्तीर्ण ६,२७,३८८

३१३ कॉपी प्रकरणांची नाेंद nपरीक्षेत कॉपी केल्याप्रकरणी ३१३ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक १४३ प्रकरणे छत्रपती संभाजीनगर मंडळात घडली आहेत. nयासह १३९ विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत आक्षेपार्ह लेखन केल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यात २१ कनिष्ठ महाविद्यालये आणि संस्थांचा शून्य टक्के निकाल लागला आहे. 

बारावीच्या निकालात कोकण विभाग राज्यात पहिला, तर मुंबई शेवटून पहिलाकोकण    ९७.५१ नाशिक    ९४.७१ पुणे    ९४.४४ कोल्हापूर    ९४.२४ छत्रपती संभाजीनगर    ९४.०८ अमरावती    ९३.०० लातूर    ९२.३६ नागपूर    ९२.१२ मुंबई    ९१.९५ 

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालStudentविद्यार्थी