शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीही करा, आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच! जात जनगणनाही करायला भाग पाडू: राहुल गांधी
2
हरयाणात भाजपाला पराभूत करत काँग्रेसची सत्ता, तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅकॉ युतीला कौल
3
मविआकडून केवळ दिशाभूल, विकासकामे रोखणाऱ्या शत्रूला निवडणुकीत रोखा: PM नरेंद्र मोदी
4
मराठी भाषेने स्वराज्यासह संस्कृतीची चेतना जागविली; पंतप्रधान मोदी यांचे कौतुकोद्गार
5
PM मोदी यांच्या हस्ते मेट्रो ३ मार्गिकेचे उद्घाटन; प्रवासात शाळकरी मुले, महिलांशी संवाद
6
दुर्गादेवी विरोधकांचा राजकीय संहार करेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मविआवर टीका
7
पंतप्रधानांचा ठाणे दौरा: तीन हजार अवजड वाहने रोखल्याने नाशिक-मुंबई प्रवास झाला सुसाट!
8
हरयाणामध्ये मतदारांनी कोणाला दिला सत्तेचा कौल? ६१ टक्क्यांपेक्षा जास्त मतदानाची नोंद
9
‘वैद्यकीय शिक्षण’मध्ये कंत्राटी भरती करणार; आपलाच निर्णय सरकारकडून धाब्यावर
10
सरळसेवेची ‘ती’ पदे ‘मानधना’वर भरणार; सुट्टीच्या दिवशी राज्य सरकारचा जीआर
11
नायगाव बीडीडी आता ‘डॉ. आंबेडकर संकुल’; महायुती सरकारचा मोठा निर्णय
12
भोजनातून शासकीय वस्तीगृहातील ४० मुलींना विषबाधा; वैद्यकीय महाविद्यालयात उपचार
13
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
14
हरियाणात भाजपाची मतं वाढणार, पण जागा घटणार; असा आहे एक्झिट पोलमधील नंबर गेम
15
IND vs BAN 1st T20: "संजू सॅमसन सलामीला खेळेल, दुसरा ओपनर म्हणून..."; सूर्यकुमार यादवने दिली मोठी माहिती
16
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
17
हार्दिकला विसरून नताशाने शोधला नवा जोडीदार? स्वीमिंग पूलमध्ये केली मौजमजा 
18
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
19
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
20
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी

आम्हीदेखील पब्लिक डॉक्टरच

By admin | Published: July 19, 2016 3:23 AM

आम्हीदेखील पब्लिक डॉक्टरच आहोत. आमच्याकडे शेकडो लोक येत असतात.

ठाणे : आम्हीदेखील पब्लिक डॉक्टरच आहोत. आमच्याकडे शेकडो लोक येत असतात. त्यांच्या मनातील सुखदु:खाचा ठाव घेऊन त्यांच्या समस्या जाणून आम्हालाही निरनिराळी औषधे द्यावी लागतात, असे आ. संजय केळकर एका कार्यक्रमप्रसंगी म्हणाले. बायोफिल्ड इव्हॅल्युएशनने आयोजित केलेल्या डॉ. अनुप देव लिखित ‘आभामंडळ - विज्ञान व चिकित्सा’ या पुस्तकाचे प्रकाशन आ. केळकर यांच्या हस्ते रविवारी पाणिनी सभागृहात पार पडले. या वेळी ते बोलत होते. आपल्या महाराष्ट्राला संतपरंपरा लाभली आहे. या संतांनी केलेले प्रबोधन हे समाजाला ताकद देणारे तसेच, मन-बुद्धी-शरीर विकसित करणारे होते. गीता हा सर्वात मोठा गुरू आहे. ज्याने शरीर व बुद्धी स्थिर राहू शकते. वर्तमानात जगणे हीच मोठी विद्या आहे. माणसाने भूतकाळात रमू नये व भविष्यात डोकावू नये, असे म्हणतात. पण, हेच तंत्र माणासाला जमत नाही. प्रत्येक माणसाने मनाचा अभ्यास केला पाहिजे आणि अध्यात्म जगले पाहिजे, असे त्यांनी आपल्या मनोगतातून मांडले. तसेच, सूक्ष्म शरीराच्या फोटोग्राफीद्वारे होणाऱ्या चिकित्सेतून संभाव्य आजार आगाऊ समजतात व उपचाराद्वारे त्यावर मातही करता येते. हे तंत्रज्ञान क्रांतिकारक असून त्यामुळे मानवाला सुखी माणसाचा सदरा उपलब्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सुमारे २५ हजार वर्षांपूर्वी ऋषिमुनींनी ऋग्वेदात सूक्ष्म शरीराबद्दल लिहून ठेवले आहे. हा सूक्ष्म देह जरी आपल्या पंचज्ञानेंद्रियांना जाणवत नसला तरी त्याबद्दल अधिक माहिती आज उपलब्ध आहे. अतिप्राचीन शास्त्रानुसार आपल्या सूक्ष्म शरीरात सात प्रमुख चक्र व ७२ हजार नाड्या आहेत. ही व्यवस्था आपल्या शरीरातील ग्रंथी व अवयवांना वैश्विक ऊर्जा पोहोचवते. चक्र , नाड्या व तेजोवलय यांना बघण्याची फोटोग्राफी उपलब्ध आहे. या आॅरा फोटोग्राफीच्या साहाय्याने शारीरिक, मानसिक, भावनिक व आध्यात्मिक समस्याच जाणता येतात, असे डॉ. देव यांनी सांगितले. डॉ. अरु णा भावे, डॉ. आशा चिरमडे, गोपाळ बेके, अजित जोशी यांनी आपले अनुभव कथन करीत आभामंडळ चिकित्सापद्धती व त्याच्या उपयुक्ततेला दुजोरा दिला. (प्रतिनिधी)