शहरं
Join us  
Trending Stories
1
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्विनी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: दहिसरमध्ये ठाकरेंकडून तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी
3
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
4
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
5
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
6
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
7
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
8
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
9
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
10
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
11
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
12
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
13
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
14
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
15
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
16
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
17
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
18
मुंबईत उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का; २ नेते पक्ष सोडणार, अपक्ष लढण्याची तयारी
19
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?
20
भयंकर! "सर, आमचा जीव वाचवा..."; गुंडांच्या भीतीने शिक्षकांनी अधिकाऱ्यांसमोर जोडले हात

शेतकऱ्यांना ‘ओक्के’ करण्यासाठीच आम्ही सत्तेत, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी बळीराजाला दिला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 8:45 AM

अतिवृष्टी आणि नापिकीमुळे शेतकरी संकटात आहे. त्याला आजपर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी शेतीविषयी दाखविलेली उदासीनता आणि ध्येयधोरणे जबाबदार आहेत.

नांदेड :

अतिवृष्टी आणि नापिकीमुळे शेतकरी संकटात आहे. त्याला आजपर्यंतच्या सत्ताधाऱ्यांनी शेतीविषयी दाखविलेली उदासीनता आणि ध्येयधोरणे जबाबदार आहेत. त्यामुळे काही धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना ‘ओक्के’ करण्यासाठीच आम्ही सत्तेत आलो आहोत, असे मत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केले.   

राज्याचे कृषिमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अब्दुल सत्तार हे पहिल्यांदाच नांदेड जिल्हा दौऱ्यावर आले होते. रविवारी पहाटे नांदेड तालुक्यातील कासारखेडा, नांदुसा येथे जात अतिवृष्टीने बाधित शेतीची त्यांनी पाहणी केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विभागीय आढावा बैठकीत त्यांनी  नुकसानाची  माहिती घेतली.  

या पाहणी दौऱ्याचा आढावा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना देऊन शेतकऱ्यांसाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अधिवेशन सुरू असल्याने बाहेर कोणतीही घोषणा करता येत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांसाठी निश्चितच समाधानाचे आणि आनंदाचे दिवस आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. पीक विमा व इतर प्रश्नांच्या अनुषंगाने राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे सकारात्मक प्रस्ताव पाठविले जातील, असे सत्तार यांनी सांगितले. 

राज्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले असून, कृषी, महसूल विभागांना उर्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. पूर्वीच्या मदतीपेक्षा अधिकची मदत विद्यमान सरकारकडून करण्यात येईल. तसेच गेल्या वर्षीचे अनेकांचे अनुदान, नुकसानभरपाई अद्यापपर्यंत मिळाली नसल्याची माहिती आमदारांकडून मिळाली आहे. त्या अनुषंगाने आवश्यक निधी आणि प्रलंबित प्रस्ताव तत्काळ कृषी खात्याकडे पाठविण्याच्या सूचना संबंधितांना दिल्याचे त्यांनी सांगितले.   

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारFarmerशेतकरी