शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

आमच्याकडे अतिरेकी म्हणूनच पाहिले जाते! - मुश्ताक वाणी

By admin | Published: July 08, 2017 4:11 AM

काश्मिरी जनता पर्यटक आणि यात्रेकरूंचे कायमच स्वागत करते. आतापर्यंत अमरनाथ यात्रेदरम्यान आलेल्या नैसर्गिक आपत्तीत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : काश्मिरी जनता पर्यटक आणि यात्रेकरूंचे कायमच स्वागत करते. आतापर्यंत अमरनाथ यात्रेदरम्यान आलेल्या नैसर्गिक आपत्तीत साहाय्यासाठी आम्ही नेहमीच पुढे होतो. तरीही आमच्याकडे कायम अतिरेकी म्हणूनच पाहिले जाते. प्रत्येक वेळी देशभक्ती आणि निष्ठा सिद्ध करण्याची सक्ती आमच्यावर केली जाते, अशी खंत श्रीनगर येथील काश्मीर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष मुश्ताक वाणी यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केली. आॅब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘काश्मीर, ए डायलॉग फॉर पीस अ‍ॅण्ड इंटिग्रेशन’ या एकदिवसीय परिसंवादात ते बोलत होते.काश्मीरबाबत सतत नकारात्मक बातम्या पसरविल्या जातात. त्यामुळे लेह, लडाख, जम्मूच्या तुलनेत केवळ १० टक्के पर्यटक काश्मीरकडे येतात. बडे उद्योजकही येथे उद्योग उभारण्यास धजत नाहीत. त्यामुळे रोजगारासाठी येथील तरुणांना केवळ शासकीय नोकऱ्यांवर अवलंबून राहावे लागते, असेही वाणी म्हणाले. या परिसंवादात बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथील मराठमोळे उपविभागीय न्यायदंडाधिकारी डॉ. सागर डोईफोडे, काश्मीरमध्ये काम करणाऱ्या असीम फाउंडेशनचे सारंग गोसावी, सद्भावना संस्थेचे संजय भावसार, सरहद संस्थेचे संजय नहर आदी सहभागी झाले होते.प्रशासनाची कार्यक्षमता गरजेची - डॉ. डोईफोडेआपल्याला वाटते त्यापेक्षा काश्मीरमधील परिस्थिती पूर्ण वेगळी असल्याचे डॉ. डोईफोडे यांनी या वेळी सांगितले. येथे काम करताना कोणतेही दडपण नाही. मात्र नागरी सुविधा सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचत नसल्याचे चित्र आहे. ते पालटण्यासाठी अधिक कार्यक्षम प्रशासनाची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.