शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
2
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
3
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
4
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
5
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
6
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
7
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
8
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
9
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
10
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
11
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
12
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
14
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
15
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
16
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
17
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
18
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
20
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले

भार दप्तराचा

By admin | Published: July 09, 2017 12:44 AM

राज्य शासनाने २१ जुलै २०१५ रोजी निर्णय घेत दप्तराचे आदर्श वजन ठरवून दिलेले आहे. या निर्णयात शासनाने शाळेसोबतच पालकांनाही काही सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य शासनाने २१ जुलै २०१५ रोजी निर्णय घेत दप्तराचे आदर्श वजन ठरवून दिलेले आहे. या निर्णयात शासनाने शाळेसोबतच पालकांनाही काही सूचना दिल्या होत्या. मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष करत विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे दिवसागणिक वाढतच आहे. मुंबईतील बहुतेक मराठी आणि इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये शासन निर्णयाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. अपवादात्मक काही शाळांनी शासन निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन दप्तर शाळेतच ठेवण्याचा उपक्रम सुरू केला आहे. तर काही शाळांनी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत विद्यार्थ्यांना टॅब आणि ई-क्लासेसच्या मदतीने दप्तराच्या ओझ्यातून मुक्त केले आहे. मुलांचे सरासरी वजन ठरवत त्यांच्या पाठीवरील दप्तराचे वजन शासनाने ठरवले होते. त्यासाठी दप्तरामधील साहित्य आणि खाऊचा डबा यांचे वजन किती असावे, याचा तक्ताही शासनाने जाहीर केला होता. मात्र, त्याकडे कानाडोळा करत शाळा प्रशासनांकडून पालकांवर साहित्य खरेदीची सक्ती केली जात आहे. त्यामुळे साहजिकच दप्तराचे ओझे वाढत आहे.न्यायालयाच्या आदेशानंतर आली जाग...दप्तराच्या वाढत्या भारामुळे मुलांच्या शारीरिक वाढीवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर राज्य शासनातर्फे तत्कालीन प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. त्यावर इयत्ता पहिलीपासून आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर किती किलो वजनाचे दप्तर असावे, याबाबतचा अहवाल समितीने सादर केला होता. तसेच पालकांनी, शाळेने कोणती काळजी घ्यावी याबाबत उपाययोजनाही सुचवण्यात आल्या होत्या. त्यानुसार शिक्षण विभागातर्फे २१ जुलै २०१५ रोजी अध्यादेश काढण्यात आला होता. राज्य मंडळाच्या शाळांकडून या नियमावलीच्या पालनाबाबत सकारात्मक पाऊल उचलले जाऊ शकते. मात्र, सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या बहुतेक सर्व शाळांकडून या निर्णयाला सध्या केराची टोपलीच दाखविली जात असल्याचे चित्र पाहायला मिळते.