शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’वर बहिष्कार टाकून सेनेने काय मिळविले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 06:08 IST

मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेवर अघोषित बहिष्कार टाकून शिवसेनेने नेमके काय मिळविले याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या परिषदेच्या निमित्ताने येणार असलेल्या औद्योगिक गुंतवणुकीचा राजकीय फायदा भाजपाला मिळेल, असे मानले जात आहे.

मुंबई : मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेवर अघोषित बहिष्कार टाकून शिवसेनेने नेमके काय मिळविले याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या परिषदेच्या निमित्ताने येणार असलेल्या औद्योगिक गुंतवणुकीचा राजकीय फायदा भाजपाला मिळेल, असे मानले जात आहे.या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८ तारखेला झाले. त्याचे निमंत्रण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले होते पण ते त्या दिवशी आले नाहीत. दुसºया दिवशी या परिषदेत उद्योग रत्न पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होते. तथापि, या समारंभालादेखील ठाकरे यांनी पाठ दाखविली. तीन दिवसांच्या परिषदेत शिवसेनेचा एकही आमदार, खासदार, मंत्री वा नेता या परिषदेकडे फिरकलादेखील नाही. अपवाद होता तो पक्षाचे नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा. उद्योग मंत्री असल्याने त्यांना परिषदेत राहणे भाग होते. त्यामुळे त्यांनी औपचारिकता निभावली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे प्रभावित झालेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये देसाई आणि एकनाथ शिंदे यांची नावे प्रामुख्याने घेतली जातात.उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’मधील अनुपस्थिती राजकीयदृष्ट्या मुख्यमंत्र्यांच्या पथ्यावर पडेल, असे म्हटले जाते. राज्याचा भौगोलिक विचार करता या परिषदेच्या माध्यमातून सर्वाधिक गुंतवणूक ही मराठवाड्यात येणार असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी यापुढे मराठवाड्यावर विकासाचा फोकस असेल असे स्पष्ट संकेत दिले आहेत. मराठवाड्यात शिवसेनेची ताकद मोठी आहे. तेथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्याचे पूर्ण श्रेय मुख्यमंत्र्यांना जाईल. लातूर रेल्वेकोच फॅक्टरीपासून हिंगोलीसारख्या उद्योगशून्य जिल्ह्यात उद्योग आणण्यासाठीचे करार या परिषदेत झाले. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत या गुंतवणुकीचे श्रेय भाजपा घेईल, हे स्पष्ट आहे.मराठवाड्यातही प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्नमागासलेल्या विदर्भात भाजपाचे प्राबल्य आहे. मात्र, मागासलेल्या मराठवाड्यात भाजपाला तेवढे प्राबल्य मिळविता आलेले नाही. विधानसभेच्या ४६ जागांपैकी भाजपाचे सर्वाधिक १५ आमदार असले तरी शिवसेनेचे ११, काँग्रेसचे ९ आणि राष्ट्रवादीचे ८ आमदार आहेत. विदर्भासारखा मराठवाड्यातही प्रभाव निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.

टॅग्स :Magnetic Maharashtraमॅग्नेटिक महाराष्ट्रShiv Senaशिवसेना