शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

काय म्हणता... कसे राहणार यंदाचे पीकपाणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2023 10:47 IST

१९७२ मधील दुष्काळ अतिशय भीषण होता. तेव्हा १८ जूननंतर मान्सून आपल्याकडे आला होता. यंदाही तशीच परिस्थिती आहे.

- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ, शब्दांकन : श्रीकिशन काळे

यंदा कमी पाऊस असल्याने सर्वांच्या डोळ्यांत पाणी येणार आहे. सर्वात जास्त शेतकऱ्यांना फटका बसेल. कारण त्यांचे सर्व अर्थकारण पावसावर अवलंबून असते. महाराष्ट्रात यावर्षी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. जूनमध्ये तर मोठा खंड पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी कालावधीत येणारी पिके घ्यावीत आणि चांगला, मोठा पाऊस झाल्यावरच पेरण्या कराव्यात.

महाराष्ट्रात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस होण्याचा अंदाज आहे. हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर मी देत असतो. वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी व तापमान कमी आढळल्याने जून, जुलै महिन्यात धुळे, जळगाव, राहुरी, कराड, अकोला येथे पावसात मोठा खंड राहणार आहे. दापोली, पुणे, कोल्हापूर, नागपूर, यवतमाळ, निफाड, सोलापूर, परभणी येथे खंडाचा कालावधी कमी राहील. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण साधारण राहणार आहे. कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठा खंड असे यंदाचा पाऊस असणार आहे.

दुष्काळी पट्ट्यात नेहमीपेक्षा अजून कमी पाऊस असेल. साधारणपणे नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर इथे सरासरी एवढा म्हणजे १०० टक्के पाऊस होऊ शकेल. पश्चिम विदर्भ अकोला इथे सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९३ टक्के पाऊस पडेल. कोकणातही सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९४ टक्के पाऊस होणार आहे. धुळे, जळगाव इथेही ९३ टक्केच पाऊस होईल. एकूणच यंदा पावसाचे प्रमाण कमी होणार असल्याने सर्वांना त्याचा त्रास सहन करावा लागेल. 

केवळ पिकांवरच नाही, तर जनावरांवरही परिणाम होणार आहे. पावसामुळे जनावरांना चारा उपलब्ध होत असतो. आताच पाण्याचे दुर्भिक्ष्य झालेले आहे. पाऊस नसल्याने पेरण्याच होऊ शकत नाहीत. पाऊस अपुरा पडणार आहे. कमी पावसाचे हे वर्ष आहे. सर्वांना जपून पाणी वापरणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न उभे राहणार आहेत. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.   

शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू करावी. पीकपद्धतीनुसार बियाणे व खतांची उपलब्धता असणे आवश्यक आहे. खरीप पिकांसाठी जमीन तयार करून शेतातील काडीकचरा, पिकांचे अवशेष गोळा करून स्वच्छता करायला हवी. तसेच पाऊस कमी असल्याने ठिबक सिंचनावर भर द्यावा. उन्ह खूप असल्याने जनावरांना गोठ्यातच मुबलक पाणी द्यावे. पाऊस कमी झाल्याने पिकांवर परिणाम होतोच. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होतील. पाऊस अजून आलेला नाही. पेरण्या उशिरा होणार आहेत. त्याचा सर्व अर्थव्यवस्थेला फटका बसणार आहे. दुष्काळी भागातील पट्ट्यात याची सर्वाधिक झळ पोचेल.   

शेतकऱ्यांनी काय करावे? 

शेतकऱ्यांनी यंदा कमी पाऊस असल्याने कमी कालावधीत येणारी पिके घ्यावीत. जोपर्यंत चांगला पाऊस होत नाही, तोपर्यंत पेरणी करू नये. कारण एक पाऊस झाला आणि लगेच पेरणी केली, तर पुन्हा दुबार पेरणीचे संकट ओढऊ शकते. म्हणून अगोदरच मोठा, चांगला पाऊस झाल्यानंतर पेरण्या करायला घ्याव्यात.  कमी कालावधीमध्ये मूग, मटकी, चवळी, घेवडा अशी पिके घेतली, तर त्याचा फायदा होईल. खरिपात काही तरी उत्पन्न मिळू शकेल. तसेच रब्बीमध्ये कमी पावसावर येणारी हरबरा, करडई आदी पिके घेणे आवश्यक आहे. खूप पाणी लागणारी पिके घेऊ नयेत. कारण तसा पाऊस पडणार नाही.

यंदा दुष्काळी स्थिती? 

१९७२ मधील दुष्काळ अतिशय भीषण होता. तेव्हा १८ जूननंतर मान्सून आपल्याकडे आला होता. यंदाही तशीच परिस्थिती आहे. म्हणून आतापासून उपाययोजना करणे गरजेचे आहे. जूनमध्ये पावसाचा मोठा खंड पडणार आहे. काही भागात चांगला पाऊस होईल. जिथे ६५ मिलिमीटर पाऊस होईल, तिथे पेरण्या करता येऊ शकतील. तोपर्यंत पेरण्या करू नयेत. १९७२ नंतर २००३, २००५, २००९, २०१२, २०१५, २०१८ मध्ये दुष्काळी स्थिती होती. गेल्या काही वर्षांमध्ये एल निनोमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. दुष्काळासाठी हा एक भाग आणि दुसरा म्हणजे हवामान बदल. या दोन्ही घटकांमुळे दुष्काळ पडत आहे.  

पावसाचा पॅटर्न बदलतोय... 

कमी पाऊस असल्याने आपले व्यवस्थापन सुधारावे लागणार आहे. दरवर्षीपेक्षा काही वर्षांतील पावसात खूप फरक दिसतोय. कमी कालावधीत अधिक पाऊस पडत आहे. तसेच सरासरीपेक्षा अधिक पाऊस काही वर्षात झाला आहे. पण यंदा मात्र कमी होणार आहे. सध्या महाराष्ट्रातील हवेचे दाब बदलत आहेत. हवेचा दाब कमी झाला की, मान्सून आपल्याकडे येईल.      

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती