शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

शरद पवारांची निवृत्ती घोषणा, काँग्रेसला वाटते वेगळीच शंका, मविआवर काय परिणाम?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2023 9:54 AM

छत्रपती संभाजीनगरच्या वज्रमूठ सभेपासून महाविकास आघाडीमध्ये जबरदस्त ऐक्य असल्याचे चित्र निर्माण झाले होते. नंतर नागपूर आणि सोमवारी मुंबईत झालेल्या सभेलादेखील मोठा प्रतिसाद मिळाला होता

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले काही दिवस असलेली अस्वस्थता आणि शरद पवार यांनी पद सोडण्याची केलेली घोषणा व त्यानंतरचा घटनाक्रम या सगळ्यांचा परिणाम महाविकास आघाडीच्या वज्रमुठीवर होण्याची शक्यता आहे. 

छत्रपती संभाजीनगरच्या वज्रमूठ सभेपासून महाविकास आघाडीमध्ये जबरदस्त ऐक्य असल्याचे चित्र निर्माण झाले होते. नंतर नागपूर आणि सोमवारी मुंबईत झालेल्या सभेलादेखील मोठा प्रतिसाद मिळाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे अधिक सख्य असल्याचे चित्र सुरुवातीपासूनच आहे. 

शरद पवार यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर आता महाविकास आघाडीतील अन्य दोन पक्ष अधिक सावध भूमिका घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीमध्ये ज्या जोरदार हालचाली सुरू आहेत त्या पक्षाच्या नेतृत्वासाठी आहेत की भविष्यात भाजपसोबत जाण्यासंदर्भात आहेत, याबाबत चित्र स्पष्ट नाही. उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या विरोधाची धार अधिक तीव्र केली  असली तरी  आपल्या लढ्यात राष्ट्रवादी नेहमीसाठी सोबत राहील का, याबाबत आता ठाकरे गटात शंकेचे वातावरण आहे.

काँग्रेस शंकेच्या वावटळीत, भाजपचे ‘वेट अँड वॉच’

काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव न देण्याच्या अटीवर सांगितले, की राष्ट्रवादीबाबत शंकेचे वातावरण आहे. उद्या जर त्यांनी वेगळा निर्णय घेतला तर आम्हाला नव्याने मोट बांधावी लागेल. राष्ट्रवादी काँग्रेस आज महाविकास आघाडीसोबतच आहे; परंतु शरद पवार हे पक्षाचे अध्यक्षपद सोडण्यावर कायम राहिले तर नवीन अध्यक्ष येतील ते भाजपसंदर्भात कोणती भूमिका घेतात हे अत्यंत महत्त्वाचे असेल आणि त्यावरच महाविकास आघाडीचे ऐक्य अवलंबून असेल. 

राष्ट्रवादीतील घडामोडीवर भाजपकडून ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेण्यात आली आहे. केवळ निवडक नेत्यांनीच याबाबत भाष्य करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माहिती घेतली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

या निर्णयावर इतर पक्षाचे नेते काय म्हणतात?

आघाडीवर परिणाम होणार नाही - राऊतराष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय का घेतला याचे विश्लेषण स्वतः शरद पवारच करू शकतात. हा निर्णय धक्कादायक वाटत असला तरी त्यात अनपेक्षित असे काही नाही, असे अलीकडच्या काही घटनांवरून वाटते, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.

आता बोलणे योग्य नाही - फडणवीसशरद पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय आणि राष्ट्रवादीची अंतर्गत बाब आहे. या क्षणाला मी आताच त्यावर बोलणे योग्य नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. योग्यवेळी त्यावर बोलू, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

त्यांना भेटून जाणून घेऊ -पटोलेनेमक्या कोणत्या कारणांमुळे त्यांनी राजीनामा दिला आहे हे सांगणं अवघड आहे. त्यांना भेटू, सर्वकाही जाणून घेऊ मग यावर बोलणे योग्य ठरेल, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस