शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?
2
विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
4
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
5
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
6
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
10
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
11
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
12
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
13
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
15
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
16
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
17
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
18
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा
19
अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार: बारामती विधानसभा कोणासाठी सोप्पी, आकडे काय सांगतात?
20
स्वरा भास्करच्या पतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभेचं तिकीट, अभिनेत्री ट्वीट करत म्हणाली...

प्राध्यापक होण्यासाठी ३० लाख द्यावे लागतात हे कोणत्या नैतिकतेत बसते?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 5:00 AM

राजन गवस यांचा सवाल : उदगीरच्या साहित्य संमेलनात रंगली मुलाखत

राम शिनगारेभारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी उदगीर (जि. लातूर) : समाज घडविण्यासाठी शिक्षक महत्त्वाचा असतो. आज शालेय पातळीवर दर्जेदार शिक्षक मिळणे दुरापास्त झाले आहे. महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक होण्यासाठी ३० लाख रुपये द्यावे लागतात. हे कोणत्या नैतिकतेत बसते? असा सवाल करीत संस्थाचालक आणि सरकारने शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला असल्याचा आरोप ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी केला. उदगीर येथे सुरू असलेल्या ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक राजन गवस यांच्या प्रकट मुलाखतीने झाली. नागपूरचे डॉ. प्रमोद मुनघाटे आणि पुण्यातील विनोद शिरसाट यांनी त्यांना बोलते केले. 

डॉ. गवस म्हणाले, आमच्या कुटुंबात कोणीही शिकलेले नव्हते. वर्ष संपले की, गेला का पुढच्या वर्गात असे विचारले जायचे. गुरं-ढोरं सांभाळत, उनाडक्या, शेतात काबाडकष्ट करीत आमचे बालपणातील शिक्षण झाले. बालपणात लिहिलेली चार ओळींची बेढर नावाची कविता दादा सबनीस यांनी छापली. हाच आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. कवितेने मला जगवले.  यानंतर कथांमधून कृषक समाजाचे चित्रण रेखाटले. हे माझ्या आयुष्याच्या संबंधितच होते. महाविद्यालयीन चळवळीत काम करताना आलेल्या अनुभवातून, वैतागातून चौंडक, भंडारभोग या कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. २५ वर्षांनंतर याच कादंबऱ्यांवर जोगवा  नावाचा चित्रपट निघाला. तणकट, ब-बळीचा या कादंबऱ्या गावातील जातीयता, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर आहेत, असेही गवस यांनी सांगितले.

कृषिजन व नागर लोकांचे आयुष्य भिन्नग्रामीण भागातील लोक जेवण करताना पहिला घास इतरांसाठी बाजूला काढून ठेवतात. तेच नागर संस्कृती असलेल्या शहरात होत नाही. शहरात देणारे नव्हे ओरबडणारे असतात. त्यामुळे कृषिजन आणि नागर भद्र लोकांचे आयुष्य भिन्न स्वरूपाचे असल्याचे मत राजन गवस यांनी मांडले.

होय, मी नेमाडपंथीमुलाखतकारांनी आपण नेमाडे घराण्याचे असल्याचे बोलले जाते, अशी चर्चा नेहमी होते, असा प्रश्न विचारला. त्यावर गवस यांनी होय मी नेमाडपंथी आहे, असे स्पष्ट केले. तसेच ज्यांनी कांदबरी लिहिण्याचे बळ दिले. त्यांच्या नावाने आपल्याला ओळखले जात असेल तर त्यात काय चूक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.