शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

महाराष्ट्रातील आणखी कोणते उद्योग गुजरातला? भूपेंद्र पटेल यांच्या मुंबई दौऱ्यानंतर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 12:43 IST

आपले उद्योग गुजरात पळवत असल्याचा आरोप करत त्यांच्यासाठी पायघड्या कशासाठी, असा सवाल विरोधी पक्षांनी उपस्थित केला आहे.  

मुंबई : महाराष्ट्रातील उद्योग, मुंबईतील वित्तीय संस्था केंद्र तसेच कार्पोरेट कार्यालये गुजरातला पळवली जात असल्याचा आरोप होत असताना गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबई दौरा केला. आपले उद्योग गुजरात पळवत असल्याचा आरोप करत त्यांच्यासाठी पायघड्या कशासाठी, असा सवाल विरोधी पक्षांनी उपस्थित केला आहे.  

गुजरात सरकारचा ‘व्हायब्रंट गुजरात’ हा महाराष्ट्रातील उद्योजकांना आकर्षित करणारा कार्यक्रम मुंबईत बुधवारी पार पडला. यासाठी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल मुंबईत आले आणि त्यांनी बड्या उद्योजकांची भेट घेऊन गुजरातमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. पटेल यांनी मुंबईत रिलायन्सचे मुकेश अंबानी, टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन एन. चंद्रशेखरन, पी अँड जीचे कार्यकारी संचालक ए. व्ही वैद्यनाथन, एस्सार कंपनीचे रुईया यांच्यासह १३ मोठ्या उद्योगपतींनी भेट घेतली. गुजरातचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन येथील उद्योग पळवत असल्याची टीका विरोधकांनी केली. आधीच अनेक प्रकल्प गुजरातला गेले, आता आणखी कोण जाणार याकडे लक्ष लागले आहे.

ठाकरेंची टीका -गुजरातचे मुख्यमंत्री मुंबईत आले. गुजरातमध्ये उद्योगधंदे वाढावेत यासाठी हा खटाटोप. पण त्यांना एवढी मेहनत करायची गरजच काय? फक्त एक फोन घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना केला असता, तर त्यांनी आनंदाने कोलांट्या उड्या मारत इकडचे उद्योग तिथे पाठवायच्या कार्यक्रमाला अधिक वेग दिला असता! अशी खोचक टीका आमदार आदित्य ठाकरे यांनी एक्सवरून केली.

फॉक्सकॉन प्रकल्प पळवून गुजरातचे पोट भरले नाही आणि हा प्रकल्प गुजरातला देऊन महायुती सरकारचे खोके भरले नाही, असे दिसते.  सरकारी नोकरीत कंत्राटी भरती करा, उद्योग गुजरातला पाठवून खासगी कंपन्यांमधील नोकऱ्या संपवा. - विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते - विधानसभा

जो महाराष्ट्र या देशात उद्योगक्षेत्रात सर्वाधिक व्हायब्रंट होता, त्या महाराष्ट्राला संपवून, मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्त्व कमी करून तुम्ही व्हायब्रंट गुजरात बनवताय?- संजय राऊत, शिवसेना नेते 

टॅग्स :Bhupendra Patelभूपेंद्र पटेलMumbaiमुंबईGujaratगुजरात