शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पावसाचा इशारा काय? पुढील दोन दिवसांत कुठे किती बरसणार? देशभरात पावसाचे काय?

By पवन देशपांडे | Updated: August 30, 2017 13:42 IST

मुंबईत पावसानं हाहाकार केल्यानंतर आता ढग दाटले की आता हा कोसळणार... त्या आधी घरी परतलेलं बरं... अशी धास्ती अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे

मुंबई, दि. 30 - मुंबईत पावसानं हाहाकार केल्यानंतर आता ढग दाटले की आता हा कोसळणार... त्या आधी घरी परतलेलं बरं... अशी धास्ती अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. हवामान खात्याने गेल्या दोन दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता तो खरा ठरला आहे. पुढील दोन दिवसही मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. 

या भागातील लोकांनी राहावे सतर्ककोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिधुदुर्ग या जिल्ह्यांना दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर आणि पुणे या जिल्ह्यांतही अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील लोकांना पुढील दोन दिवस सतर्क राहावे, असे सांगण्यात आले आहे. मराठवाड्यातही अशाच प्रकारचा पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

स्कायमेटचा पावसाबद्दलचा अंदाज काय?गेल्या चोवीस तासांमध्ये रेकॉर्डब्रेक पाऊस झाल्यानंतर आता आज काही अंशी मुसळधार पावसापासून मुंबईकरांचा सुटका होऊ शकते, असा अंदाज स्कायमेट या हवामानाचा अंदाज वर्तविणाºया खासगी संस्थेने वर्तविला आहे. आज (बुधवारी) अतिवृष्टी होणार नसल्याचे स्कायमेटचे म्हणणे आहे. अतिवृष्टीसाठी लागणारी परिस्थिती आता पुढे सरकली असून, येत्या काळात मुंबईत मुसळधार पाऊस होणार नाही. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असे स्कायमेटच्या हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.सकाळपासून काही ठिकाणी पाऊस पडला आहे. मात्र मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसासारखी स्थिती आता ओसरल्याचे चित्र आहे. दुपारी मुंबईत काही ठिकाणी पावसाने विश्रांतीही घेतली आहे. 

आतापर्यंत या पावसाळ्यात किती पडला मुंबईत पाऊसगेल्या चोवीस तासात मुसळधार पावसाने अनेकांना २६ जुलैच्या महाभयंकर आठवणी जागृत केल्या असून, एकाच दिवसात सांताकृज वेधशाळने 331.4 मिमि पावसाची नोंद केली आहे. तर 1 जानेवारीपासून आतापर्यंत 2333.9 मिमि पाऊस झाला आहे. कुलाबा परिसरात गेल्या चोविस तासांमध्ये 111 मिमि पाऊस झाला असून, यंदाच्या पावसाळ्यात 1725.6 मिमि पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. 

देशभरातील पावसाची स्थिती काय?देशात पाच राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून, काही भागांमध्ये अजूनही पावसाची तूट आहे. जवळपास ७० टक्के भारतात सरासरी पाऊस झाला आहे. गुजरात, पश्चिम राजस्थान, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी, आंध्रप्रदेशचा किनारपट्टीचा भाग आणि पूर्व भारतातील त्रिपुरा, मिझोरम आणि मणिपूर या राज्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. पंजाब, चंडिगढ, राजस्थानचा उत्तरेकडील भाग, दिल्ली, उत्तर प्रदेशातील पश्चिमेकडील भाग, मध्य प्रदेशाचा पूर्वेकडील भाग, महाराष्ट्रातील विदर्भ, दक्षिण कर्नाटक आणि केरळमध्ये पावसाची अद्याप तूट आहे. भारतात आतापर्यंत सरासरी 700.3 मिमि एवढा पाऊस अपेक्षित असतो. त्या तुलनेत 673.8 मिमि एवढा पाऊस झाला आहे. 

टॅग्स :Mumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकारMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका