शहरं
Join us  
Trending Stories
1
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
2
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
3
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
4
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
5
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
6
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
7
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
8
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
9
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
10
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
11
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
12
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
13
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
14
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'
15
Exclusive: "मला हिंदी बिग बॉससाठी दोन वेळा विचारलं होतं, पण...", आर्या जाधवचा मोठा खुलासा
16
चिंताजनक! मोबाईलशिवाय जगण्याची भीती वाटते?; 'या' आजाराचा मोठा धोका, 'ही' आहेत लक्षणं
17
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
18
CRPF मध्ये नोकरीची संधी, ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही मिळणार तगडा
19
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
20
या कंपन्यांमध्ये नोकरीसाठी द्यावा लागतो सर्वात कठीण इंटरव्यू, पण पगारही मिळतो कोटींच्या घरात

पाकिस्तानवर बळाचा वापर करायला मुहूर्त शोधावा काय? - उद्धव ठाकरे

By admin | Published: January 03, 2017 7:45 AM

पठाणकोटपासून उरीपर्यंत पाकड्यांनी सांगून व ठरवून हल्ले केले व आपण बळाचा वापर कधी करावा यासाठी योग्य मुहूर्ताच्या शोधात असू, तर ते योग्य नाही असं उद्धव ठाकरे बोलले आहेत

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - कोणत्याही युद्धाशिवाय आमच्या जवानांना बलिदान द्यावे लागत आहे. जवानांची बलिदाने थांबवून त्यांना सन्मान व प्रतिष्ठा देण्यासाठी नव्या लष्करप्रमुखांनी त्यांची कारकीर्द राबवली तर देश त्यांचा जास्त ऋणी राहील. बळाचा वापर करू हे त्यांचे विधान हास्यास्पद ठरू नये इतकेच. वेळ सांगून येत नसते हे बरोबर, पण पठाणकोटपासून उरीपर्यंत पाकड्यांनी सांगून व ठरवून हल्ले केले व आपण बळाचा वापर कधी करावा यासाठी योग्य मुहूर्ताच्या शोधात असू, तर ते योग्य नाही अशी खंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. 
 
देशाचे लष्करप्रमुख योग्य तेच बोलले व त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच, पण पाकड्यांना धडा शिकवण्याची ती योग्य वेळ नक्की कधी येणार? व त्याबाबत सरकार मुहूर्त वगैरे काढण्यात अडकले आहे काय? पाकिस्तानातही अलीकडेच नव्या लष्करप्रमुखांनी सूत्रे हाती घेतली आहेत व त्यांनीही आल्या आल्याच हिंदुस्थानला दम भरणारे फूत्कार सोडले हेसुद्धा लक्षात घेतले पाहिजे. पाकच्या नवीन लष्करप्रमुखांचेही म्हणणे असेच पडले की, हिंदुस्थानला वेळ येताच धडा शिकवू. हा धमक्या देण्याचा कार्यक्रम दोन्ही बाजूंनी साठ-पासष्ट वर्षांपासून सुरूच आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. 
 
आमचे लष्कर सदैव सज्ज आणि हिंमतवान आहेच. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते सीमेवर झुंज देत आहे. मात्र अनेक वर्षांपासून ते ‘खंदकां’त योग्य आदेशांची वाट पाहत बसले व खंदकात जळमटे वाढली आहेत हेदेखील तितकेच खरे आहे. तेव्हा आपल्या जवानांची हिंमत व ५६ इंचांची छाती आहेच. छातीवर गोळ्या झेलत दुश्मनांचा खात्मा करण्यासाठीही ते सज्ज आहेत, मात्र पाकिस्तानला धडा शिकविण्याची राजकीय इच्छाशक्ती दिल्लीतील राज्यकर्त्यांत आहे काय, हाच खरा प्रश्‍न आहे असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 
 
वास्तविक, गेल्या अडीच वर्षांत कश्मीर खोर्‍यात सर्वाधिक जवान शहीद झाले आहेत. पाकिस्तानसारखा चिमूटभर देश अतिरेकी हिंदुस्थानात घुसवून वारंवार आपल्या जवानांचे हत्याकांड घडवीत असताना आपण गप्प का म्हणून राहायचे? आपल्याच जवानांचे मृतदेह आपण किती वेळा मोजत बसायचे? असुरक्षिततेची टांगती तलवार आणखी किती वर्षे सहन करायची? असे संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले आहेत.
 
मागच्या दीड-दोन वर्षांत तर पाकिस्तानने शेकडो वेळा युद्धबंदी मोडून हिंदुस्थानी लष्कराच्या चौक्यांवर हल्ले चढवले. सरहद्दीलगत असलेल्या गावांची परिस्थिती तर भयावह झाली आहे. पाकिस्तानी तोफगोळे कधीही घरादारांवर येऊन आदळतात. ग्रामस्थ जीव मुठीत धरून सुरक्षित ठिकाणी पळ काढतात. ही पळापळ एकदाची थांबलीच पाहिजे. मध्यंतरी पाकड्यांवर जो सर्जिकल स्ट्राइक की काय केला, हासुद्धा म्हणे बळाचाच वापर होता व त्यामुळे पाकड्यांचे दात पूर्णपणे घशात गेल्याचे सांगण्यात आले होते, पण त्या सर्जिकल स्ट्राइकनंतरही सीमेवर ७० पेक्षा अधिक जवानांना वीरमरण पत्करावे लागले असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.