शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
3
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
4
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
5
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
6
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
7
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
8
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
9
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
10
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
11
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
12
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
13
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
14
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
15
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
16
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
17
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
18
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
19
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
20
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट

मद्य कारखान्यांच्या पाण्याचे करायचे काय?

By admin | Published: May 05, 2016 1:34 AM

जिल्ह्यातील मद्यनिर्मितीच्या कारखान्यांचे पाणी कपात करण्यात आले आहे़ मात्र, हे पाणी पिण्यायोग्य नाही़ त्यामुळे उपलब्ध झालेल्या १५ कोटी लीटर पाण्याचे करायचे काय?,

अहमदनगर : जिल्ह्यातील मद्यनिर्मितीच्या कारखान्यांचे पाणी कपात करण्यात आले आहे़ मात्र, हे पाणी पिण्यायोग्य नाही़ त्यामुळे उपलब्ध झालेल्या १५ कोटी लीटर पाण्याचे करायचे काय?, असा पेच प्रशासनासमोर निर्माण झाला आहे़ मद्यनिर्मितीच्या कारखान्यांचे ५० टक्के पाणी कपात करून हे पाणी पिण्यासाठी उपलब्ध करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला आहे. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत जिल्ह्यातील २६ कारखान्यांनी स्वत: हून पाणी पुरवठ्यात ५० टक्के कपात केली आहे़ तसा अहवाल त्यांनी बुधवारी दिला. यानुसार २७ एप्रिल ते १० जून, या काळात १५ कोटी लीटर पाणी वाचणार आहे़ परंतु उपलब्ध होणारे पाणी पिण्यासाठी योग्य आहे की नाही, याची चाचपणी केली असता बहुतांश कारखान्यांचे पाणी पिण्यासाठी योग्य नाही, असे प्रशासनाचे प्राथमिक मत आहे. त्याचा पिण्यासाठी कसा वापर करता येईल, याचा अहवाल संबंधित तहसीलदारांकडून मागवला आहे़ त्यासाठी लागणारा खर्चही यंत्रणांना दिला जाणार आहे़ न्यायालयाचा आदेश असल्याने प्रशासन याबाबत अधिकृतपणे काही बोलत नाही.एमआयडीसीचे पाणी पिण्यायोग्यच- नगरसह सुपा औद्योगिक वसाहतीतील इतर कारखान्यांचे २० टक्के पाणी कपात करण्यात आले असून, त्यामुळे २७ एप्रिल ते ९ मे या काळात १७ कोटी लीटर, तर १० जूनपर्यंत ५५ कोटी लीटर पाणी उपलब्ध होणार आहे़ हे सर्व पाणी पिण्यासाठी योग्य असून, ते टँकरद्वारे उपलब्ध करून देणे शक्य आहे़