शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

तुम्ही काय हजामती करत होतात का?; जयंत पाटील नागपूर दंगलीवरून गृह विभागावर बरसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 18:34 IST

Jayant Patil Nagpur Riots: नागपूरमधील दंगल पूर्वनियोजित कट करून घडवण्यात आली अशी माहिती सरकारने विधानसभेत दिली. यावर बोट ठेवत आज जयंत पाटील यांनी गृह मंत्रालयावर हल्ला चढवला.

Jayant Patil Nagpur News:नागपूरमध्ये झालेल्या दंगलीच्या घटनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी गृह मंत्रालयाला सुनावले. दंगल पूर्वनियोजित कट करून घडवण्यात आल्याच्या मुद्द्यावरून जयंत पाटील सरकार बरसले. पूर्व नियोजित कट होता, तर तुम्ही काय हजामती करत होतात का?, संतप्त सवाल पाटलांनी विधानसभेत केला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रात झालेल्या दंगलींची आकडेवारी जयंत पाटलांनी सभागृहात सांगितली. २०२४ मध्ये देशात सर्वाधिक दंगली महाराष्ट्रात घडल्या आहेत, असे सांगत त्यांनी चिंता व्यक्त केली. 

हेही वाचा >> नागपूर दंगलीतील मुख्य आरोपी फहीम खानवर 'योगी स्टाईल' कारवाई

जयंत पाटील म्हणाले, या दंगली का होतात? कशा होतात?

"२०२४ मध्ये देशात ५९ जातीय दंगली झाल्या. त्यातील १२ दंगली महाराष्ट्रात घडल्या आहेत. २०२२ पासून महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशात जातीय दंगलींमध्ये वाढ झाली. २०२४ मध्ये महाराष्ट्रात १२, गुजरात ५, मध्य प्रदेशात ५ आणि राजस्थानात तीन दंगली झाल्या. या दंगली का होतात? कशा होतात? या महाराष्ट्राचा आकडा एवढा वर जातोय. यातून किती अस्वस्थता आपण खाली तयार केली आहे, काम सरकारने करावं", असा सल्ला त्यांनी महायुती सरकारला दिला. 

कुठेतरी बसले असतील ना? पाटलांचा सवाल

नागपूरमध्ये घडलेल्या दंगलीबद्दल जयंत पाटील म्हणाले, "अमरावती परिसरात दंगल झाली. परवा नागपूरला दंगल झाली. आता नागपूरच्या दंगलीत असं सांगण्यात आलं की, हा पूर्वनियोजित कट होता. अरे पूर्वनियोजित कट होता, तर तुम्ही काय हजामती करत होतात का? पूर्व नियोजित कट म्हणजे नियोजन आहे. म्हणजे कुठेतरी बसून केला असेल. कुठेतरी बसले असतील ना?", असा सवाल करत तपास यंत्रणांच्या अपयशावर त्यांनी बोट ठेवलं.  

जयंत पाटील पुढे म्हणाले, "पोलीस खाते काय करत होते? पूर्व नियोजित कट जर आधी पकडता आला, तर ते पोलीस खाते. म्हणजे आपणच कबूल करतोय. अचानक झालेली दंगल आपण समजू शकतो. पूर्वनियोजित कट झाला आणि दंगल झाली. नागपूरसारख्या शहरामध्ये दंगल होणं म्हणजे... सगळ्यात शांत प्रवृत्तीची लोक त्या नागपूरमध्ये राहतात. तिथे दंगल घडवून आणली म्हणजे दंगल घडवून दाखवणाऱ्याचं कौतुक आहे", असा उपरोधिक टोला त्यांनी गृह मंत्रालय आणि सरकारला लगावला. 

सरकारला चालतंय असा मेसेज जातोय -जयंत पाटील

"सगळ्यात टॉप स्कील वापरलं. एका अर्थाने त्यांचा सत्कारच करायला पाहिजे. तुम्ही ज्या पद्धतीने लोकांच्या भावनाशी खेळ केला म्हणून सरकारने अशा गोष्टींकडे ठामपणे बघितले पाहिजे. सरकारला चालतंय असा अप्रत्यक्ष मेसेज जात आहे. कारण सरकारमध्ये बसलेले लोक देखील वेगवेगळ्या भूमिका घेतात. लोकांना असं वाटायला लागतं की, आपल्याला याचं लायसन्स आहे. त्यामुळे किमान सरकारमध्ये बसणाऱ्यांनी त्याचं उदात्तीकरण करणे, त्याला प्रोत्साहन देणं ही भूमिका घेऊ नये, अशी माझी विनंती आहे", असे म्हणत त्यांनी वादग्रस्त विधाने करणाऱ्या मंत्र्यांनाही अप्रत्यक्षपणे सुनावले.   

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलnagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीNagpur Policeनागपूर पोलीसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस