शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

Devendra Fadnavis: औरंगाबादचं संभाजीनगर करण्याच्या निर्णयाचं काय होणार? फडणवीसांकडून चर्चेवर पडदा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2022 2:39 PM

"खरे तर राज्यपालांचे पत्र आल्यानंतर जोपर्यंत विश्वासमत प्राप्त होत नाही, तोवर कॅबिनेटची मिटिंग घ्यायची नसते, हा संकेत आहे. तरी तुम्ही कॅबिनेटची बैठक घेतली."

संपूर्ण वाटचालीत एक शिवसैनिक आज राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांची एकूण कारकीर्द आणि स्वभाव बघितला तर, नेत्यांच्या उपलब्धतेचे जे डेफिसिट तयार झाले होते ते दूर होईल. लोकांना आपले नेते आपल्यात हवे, असे सातत्याने वाटत होते. हा नेता जनसामान्यांना उपलब्ध असेल. मुंबईतच नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, एका कॉलवर आणि शेवटच्या माणसाचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न हा नेता करेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी औरंगाबादचे संभाजीनगर करण्याच्या निर्णयावरही भाष्य केले. ते शिंदे सरकारने बहुमताची अग्नीपरीक्षा जिंकल्यानंतर विधानसभेत बोलत होते. फडणवीस म्हणाले, "भलेही शेवटच्या कॅबिनेटमध्ये तुम्ही काही निर्णय घेतले. खरे तर राज्यपालांचे पत्र आल्यानंतर जोपर्यंत विश्वासमत प्राप्त होत नाही, तोवर कॅबिनेटची मिटिंग घ्यायची नसते, हा संकेत आहे. तरी तुम्ही कॅबिनेटची बैठक घेतली. त्या बैठकीत काही निर्णयही घेतले मग तो संभाजीनगरचा असो, धाराशिवचा असो की तो दि. बा. पाटील यांचा असो किंवा इतरही काही निर्णय असतील. जरी ती कॅबिनेट संकेताप्रमाणे घेता येत नाही, तरी तुम्ही निर्णय घेतले असले तरी, मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की आपलीही भूमिका तीच आहे. आपणही त्याच भूमिकेचे आहोत." 

तसेच, यामुळे काळजी करू नका.  तुमच्या शेवटच्या कॅबिनेटचे निर्णय पुन्हा कॅबिनेटमध्ये घेऊन ते निर्णय लागू करण्याचे काम हे सरकार करेल, हा विश्वास तुम्हाला देतो. तसेच संपूर्ण सभागृहाच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांचे अतीशय मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि विरोधी पक्षालाही सहकार्याची विनंती करतो, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेvidhan sabhaविधानसभा