शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
2
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
3
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
4
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
6
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
7
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
8
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
9
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
10
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
11
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
12
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
13
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
14
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
15
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
16
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
17
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
18
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
19
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
20
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी

तुमच्या भांडणाशी मुंबईचा काय संबंध?

By admin | Published: February 15, 2017 3:52 AM

मुंबई महापालिका निवडणुकीतील आपल्या पहिल्याच प्रचारसभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीतील आपल्या पहिल्याच प्रचारसभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले. २५ वर्षे महापालिकेत यांनी एकत्र भ्रष्टाचार केला. आता कोंबड्यांसारखे झुंजत आहेत. यांच्या भांडणाशी मुंबईचा काय संबंध, असा सवाल राज यांनी केला. विक्रोळी येथील सभेने राज यांनी आपल्या प्रचार मोहिमेला सुरुवात केली. नव्या वर्षात नवा भारत दिसेल, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदी केली. मात्र, दोनशे जणांचा बळी घेणाऱ्या नोटाबंदीने काय साधले याचे उत्तर दिले जात नाही. खोट्या नोटा येतच आहेत. कॅशलेसचाही काही पत्ता नाही. निवडणुकीच्या मोसमात फक्त भाजपाकडे पैसा आहे. पार्टी विथ डिफरन्स म्हणजे आमच्याकडे पैसा, तुमच्याकडे नाही, असाच प्रकार सुरू आहे. सगळीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे होर्डिंग दिसत आहेत. कल्याण-डोंबिवलीसाठी सहा हजार कोटी देण्याची घोषणा त्यांनी पूर्वी केली होती. अजून साडेसहा रुपयेसुद्धा दिले नाहीत. शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांनी मुंबईतील मोकळ्या जागांवर स्वत:चे क्लब उघडले. सामान्यांसाठी काय केले, असा सवाल राज यांनी केला. २५ वर्षे पालिकेत सेना-भाजपा एकत्र आहेत. आता अचानक भाजपाला शिवसेनेचा भ्रष्टाचार दिसू लागला आहे. २५ वर्षे एकत्र होतात तेव्हा तुमच्या हाती काही लागले नाही का, इतकी वर्षे भ्रष्टाचाराला तुम्ही हातभार लावलाच ना, असा सवाल राज यांनी या वेळी केला. भाजपाला फक्त निवडणुका जिंकायच्या आहेत. १९५२ साली स्थापन झालेल्या भाजपाला आजही दुसऱ्या पक्षातून उमेदवार फोडावे लागतात, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली. शिवसेना-भाजपाच्या कारभारावर टीका करताना नाशिकमध्ये अवघ्या पाच वर्षांत विकासकामे केल्याचा दावा राज यांनी केला. पाच वर्षांत डम्पिंग ग्राउंडचा खत प्रकल्प केला. टाटांच्या सहकार्यातून बोटॅनिकल गार्डन उभारले. आजपर्यंत त्याला ५० हजार लोकांनी भेट दिली. स्वत: रतन टाटांनी त्या कामाचे कौतुक केले, असे राज म्हणाले. (प्रतिनिधी)परिस्थिती जैसे थे केवळ ३७ हजार कोटींचे बजेट मांडले जाते, काम केले जात नाही. नवीन रस्ते बांधल्यानंतर त्यावरील खड्डे बुजविण्याचे कंत्राट काढणारे मुंबई एकमेव शहर आहे. रस्ते, आरोग्य आणि शिक्षणावर कोट्यवधींचा खर्च होतो. मात्र परिस्थिती जैसे थे आहे, अशी टीका राज यांनी केली. पुढील चाळीस वर्षांसाठी नाशिकच्या पाण्याच्या प्रन सुटेल अशी पाइपलाइन योजना टाकली. खड्डे नसलेले रस्ते उभारले. टाटांच्या सहकार्यातून बोटॅनिकल गार्डन उभारले. आजपर्यंत त्याला ५० हजार लोकांनी भेट दिली. स्वत: रतन टाटांनी त्या कामाचे कौतुक केले, असे राज म्हणाले.