शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
2
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
3
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
4
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
5
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
6
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
7
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
8
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
9
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
10
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
11
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
12
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
13
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
14
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
15
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
16
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
17
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
18
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
19
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
20
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू

जे जे अनैतिक आहे, ते काम संजय राऊत करतात; चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2022 12:06 PM

संजय राऊतांकडे पुरावे असतील तर त्यांनी कोर्टात जावं. त्यांना कोर्टात जाण्यापासून कुणी रोखलं आहे असा आरोप भाजपाने केला.

मुंबई – कालचक्र नेहमी फिरत असते. कोण कोणाला म्हसनात पाठवेल हे कळेल. जनता सगळ्यांना उत्तर देईल अशा शब्दात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या टीकेचा समाचार घेतला आहे. राज्यसभेच्या तिसऱ्या जागेसाठी केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिले तर लढवणार आणि जिंकणारही असंही त्यांनी सांगितले आहे. त्याचसोबत संजय राऊतांवर चंद्रकांत पाटलांनी(BJP Chandrakant Patil) निशाणा साधला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, जवळजवळ ज्या कारवाया झाल्यात त्या कोर्टात सिद्ध झाल्या. परंतु कोर्टावरही त्यांचा अविश्वास आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यावरील आरोप कोर्टाने नाकारले नाहीत. जे आरोपपत्र दाखल झाले त्यावर कोर्टाने सहमती दर्शवली. संजय राऊतांचे काम केवळ तपास यंत्रणावर संशय निर्माण करण्याचं आहे. जे जे अनैतिक आहे म्हणजे शरद पवारांच्या सांगण्यावरून शिवसेना-भाजपात तेढ निर्माण करण्याचं काम राऊतांचे आहे. २०१४ पासून गेल्या ८ वर्षापासून हेच सुरू आहे असा आरोप त्यांनी राऊतांवर केला.

तसेच भाजपा नेत्यांवर आरोप असतील तर न्यायालय आहे. अनिल देशमुखांबाबत जयश्री पाटील कोर्टात गेल्या. कोर्टाने गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर गुन्हा दाखल झाला. संजय राऊतांकडे पुरावे असतील तर त्यांनी कोर्टात जावं. त्यांना कोर्टात जाण्यापासून कुणी रोखलं आहे. राऊतांना कोर्टात जाता येत नसेल असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. त्याचसोबत तपास संस्थांवर प्रश्नचिन्ह उभं करणं, भारतीय संविधानाने यंत्रणा बनवल्या आहेत. संविधानाच्या चौकटीत या तपास यंत्रणा काम करतात. त्यावर आरोप करणं योग्य नाही. भाजपा कधीही यंत्रणांवर अविश्वास दाखवत नाही असंही त्यांनी स्पष्ट केले.

सदानंद सुळेंनी ग्रामीण भागात फिरावं

सदानंद सुळे यांनी ग्रामीण भागात राहायला शिका. आई पोराला म्हसनात जा म्हणते अशी म्हण आहे. सुप्रिया सुळेंचा अनादर करण्याचा प्रश्न नाही. भाजपा कधीही महिलांचा अपमान करत नाही. तुमच्या पत्नीचा असो वा कुठल्याही महिलेचा अनादर करण्याचा माझा स्वभाव नाही असं उत्तर चंद्रकांत पाटील यांनी सदानंद सुळेंना दिले आहे.

काय म्हणाले होते संजय राऊत?

ज्याप्रकारे अनिल परब यांच्यावर कारवाई होतेय त्याहून गंभीर गुन्हे भाजपा नेत्यांवर आहेत. मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही. सूडाच्या भावनेने कितीही कारवाया केल्या तरी आम्ही गप्प बसणार नाही. सरकार सुरळीत चालेल. महाराष्ट्राच्या राजकारणाला इतके वाईट वळण गेल्या ५५ वर्षात मिळालं नव्हतं. शिवसेनेचं मनोबल आणि मविआ सरकारचं मनोबल खच्चीकरण होत नाही. भाजपा नेत्यांविरोधात आमच्याकडे सक्षम पुरावे आहेत. नवलानीला कुणी पळवले त्याचे उत्तर द्यावे असं संजय राऊतांनी सांगितले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलBJPभाजपाSanjay Rautसंजय राऊत