शहरं
Join us  
Trending Stories
1
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
2
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
3
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
4
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
5
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
6
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
7
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
8
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
9
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
10
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
11
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
12
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
13
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
14
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
15
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
16
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
17
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
18
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
19
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
20
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?

मुंबईची तहान भागवणाऱ्या तालुक्याची पाणी टंचाई कधी दूर होणार : पांडुरंग बरोरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 13:27 IST

शहापूर तालुक्यातील पाणी प्रश्न मागील साडेचार वर्षात आतापर्यंत पाच वेळा लक्षवेधीत मांडला, मात्र अजूनही कोणतेही उपयोजना करण्यात आल्या नाहीत.

मुंबई - महाराष्ट्राला यावेळी दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. धरणांचा तालुका समजल्या जाणारा आणि मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारा शहापूर तालुका सुद्धा दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक राजधानीची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई कधी दूर होणार असा प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांनी विधानसभेत उपस्थित केला.

शहापूर तालुक्यात यावेळी सुद्धा पाणी टंचाई निर्माण झाली आहे. याच मुद्यावरून सोमवारी विधानसभेत आमदार पांडुरंग बरोरा यांनी सरकारला जाब विचारला. शहापूर तालुक्यातील पाणी प्रश्न मागील साडेचार वर्षात आतापर्यंत पाच वेळा लक्षवेधीत मांडला, मात्र अजूनही कोणतेही उपयोजना करण्यात आल्या नाहीत. तालुक्यातील २८५ गावांना पाणी टंचाईचा फटका बसला आहे. २२५ गावांना ३७ टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याची आकडेवारी बरोरा यांनी विधानसभेत मांडली. तर, मुंबईची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्याची तहान कधी भागवणार असा प्रश्न बरोरा यांनी उपस्थित केला.

भाजप सरकार आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी जिल्हा परिषदेला आदेश दिले होती की,सर्वे करून तातडीने पाणी पुरवठा योजना राबवून पाणी टंचाई दूर करा. प्रत्यक्षात काही काम झालेच नाही. राष्ट्रीय पेयजल योजनेतून २८५ गावांसाठी डीपीआर तयार करण्यात आला आहे. या योजनेला तांत्रिक मान्यता सुद्धा मिळाली आहे. मात्र उद्या संपणाऱ्या अधिवेशनापूर्वी या योजनेला प्रशासकीय मान्यता देण्यात यावी, तसेच आगामी निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी निविदा काढण्यात यावी अशी मागणी आमदार पांडुरंग बरोरा यांनी केली.