शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Maharashtra Cabinet: खातेवाटप कधी जाहीर होणार?; देवेंद्र फडणवीसांनी सांगून टाकली तारीख

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 19:37 IST

मंत्रिमंडळ विस्तारानंतर सगळ्यांचे लक्ष खातेवाटपाकडे आहे. अधिवेशनापूर्वी खातेवाटप होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, पण अधिवेशन संपले तरी याबद्दल काहीही निर्णय झाला नाही. 

Maharashtra News: राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपले तरी महायुती सरकारकडून खातेवाटप जाहीर करण्यात आले नाही. अधिवेशनापूर्वी खात्यांचे वाटप जाहीर केले जाईल, असे महायुतीतील नेत्यांकडून सांगितले जात होते. दरम्यान हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेतली. यावेळी खातेवाटपाबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता, मुख्यमंत्री फडणवीसांनी माहिती दिली.  

महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार १५ डिसेंबर रोजी झाला. एकूण ३९ मंत्र्‍यांनी मंत्रि‍पदाची शपथ घेतली. हिवाळी अधिवेशनादरम्यान खातेवाटप होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पण तसा निर्णय झाला नाही. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटपाबद्दलचा मुद्दा निकाली काढला. 

फडणवीस म्हणाले, 'लवकरच होणार' 

खातेवाटप कधी होणार आहे, खातेवाटपाचा निर्णय इतका का लांबत आहे, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, "खातेवाटप लवकरच होणार आहे. लवकरचा अर्थ ते आजही (२१ डिसेंबर) होऊ शकतं किंवा उद्या (२२ डिसेंबर)सकाळी देखील होऊ शकतं", असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले.  

काही खात्यांवरून गुंता?

भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या महायुती सरकारमध्ये काही खात्यावरून गुंता होता. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गृह खात्यासह इतर काही महत्त्वाची खाती हवी होती, असे सूत्रांनी सांगितले. त्याचबरोबर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसही काही खात्यांसाठी आग्रही होती.

यासाठी महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांच्या मुंबई आणि दिल्लीत बैठका झाल्या. हिवाळी अधिवेशनादरम्यानही हा मुद्दा महत्त्वाचा ठरला. अखेर मुख्यमंत्री फडणवीसांकडून यावर उत्तर देण्यात आले. 

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMahayutiमहायुतीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार