शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
5
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
7
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
8
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
9
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
10
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
11
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
12
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
13
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
14
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
15
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
16
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
17
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
18
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
19
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
20
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार

शिवसेना-मनसे युती अडली कुठे?; याआधी २ वेळा दिला होता प्रस्ताव, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2023 10:30 AM

जनभावनेचा सन्मान केलाच पाहिजे. लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार आहे असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं.

मुंबई – राज्यातील राजकारणात गेल्या ४ वर्षात तिसऱ्यांदा राजकीय भूकंप घडला आहे. अजित पवारांसह राष्ट्रवादीचे ८ दिग्गज नेते सरकारमध्ये सहभागी झाले. शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे पक्षात फूट पडली तशीच फूट आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडल्याचे चित्र समोर आले आहे. त्यात आता उद्धव ठाकरे आणि मनसे यांच्या समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना भवनासमोर एका कार्यकर्त्याने बॅनर लावून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना आतातरी एकत्र या असं आवाहन केले होते.

त्यात सोमवारी मनसे नेत्यांच्या बैठकीतही काही वरिष्ठांनी लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंना साथ देऊया असं विनंती केली. मात्र त्यावर राज ठाकरेंनी वेट अँन्ड वॉचची भूमिका घेतली. शिवसेना-मनसे युती नेमकी अडली कुठे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, मी कार्यकर्ता असून राज ठाकरे जे आदेश देतील तसे आम्ही काम करतो. २०१४ आणि २०१७ या दोन्ही वेळेला राज ठाकरेंनी युतीचा प्रस्ताव दिला होता त्यावर उद्धव ठाकरेंकडून सकारात्मक पाऊलं उचलले नाही. टाळाटाळ केली गेली. ऐन वेळी समोरून माघार घेतली. हा जुन्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. ही वस्तूस्थिती आहे. मनसे आणि उबाठा गटाचे शीर्ष नेतृत्व काय विचार करते त्यावर अवलंबून आहे. राज ठाकरे यांनी कालच्या बैठकीत छान विधान केले. राजकीय पक्ष म्हणून सत्ता काबीज करणे हे समजू शकतो पण सत्तापिपासू होणे गैर आहे. युती आणि आघाडी हे गरजेतून घडते असं त्यांनी सांगितले.

तसेच जनभावनेचा सन्मान केलाच पाहिजे. लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार आहे. युती होईल का नाही हे दोन्ही बाजूने ठरवले पाहिजे. राजकीय गणित कशी जुळवावी लागतात. भविष्यात काय होईल सांगता येत नाही. ठाकरे बंधु एकत्र येतील का हे काळच ठरवेल. जनता व्यक्त होत असते. पुढे काय होईल हे आगामी काळात कळेल असं सांगत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मनसे-उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर सूचक विधान केले आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसे