शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

‘मी कोण बाई, मलाच ठाऊक नाही?’

By admin | Published: January 19, 2016 1:30 AM

नव्वदच्या दशकापासून आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरणाच्या वेढ्यात समाज ढवळून निघाला आणि स्त्रीच्या जीवनालाही नवे आयाम प्राप्त झाले

ज्ञानोबा-तुकारामनगरी (पिंपरी) : नव्वदच्या दशकापासून आर्थिक उदारीकरण, जागतिकीकरणाच्या वेढ्यात समाज ढवळून निघाला आणि स्त्रीच्या जीवनालाही नवे आयाम प्राप्त झाले. ‘स्व’चे अस्तित्व, ‘स्व’शी संघर्ष यातूनच स्त्रीवादाचा आणि स्त्रीवादी साहित्याचा जन्म झाला. कवितेतून अनुभव व्यक्त करण्याचे धाडस स्त्रीने दाखवले. या प्रवासाचा अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे; त्यासाठी चिकित्सा, विश्लेषण सुरूच राहणार आहे, असे मत मान्यवर कवींनी व्यक्त केले.८९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये ‘१९८० नंतरची मराठी कविता स्त्रीकेंद्रित आहे’ या विषयावर परिसंवाद आयोजिण्यात आला होता. लेखिका डॉ. अश्विनी धोंगडे अध्यक्षस्थानी होत्या. परिसंवादात डॉ. मनोहर जाधव, सीमा रोठे, डॉ. समिता चव्हाण, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, प्रा. रुपाली शिंदे, सुषमा करोगल यांनी सहभाग नोंदविला.डॉ. कार्व्हालो म्हणाल्या, ‘‘स्त्री ही माणूसच आहे, हा विचार आजच्या कवितेतून दिसतो. आजच्या कविता आश्वासक, धाडसी वाटतात. पूर्वी स्त्रिया व्यक्त होऊ शकत नव्हत्या. त्या वेळी त्यांच्या वतीने दुसरे कोणीतरी लिहायचे. आजच्या मानवकेंद्रित कवितेने स्त्रीला अभिव्यक्तीस्वातंत्र्य दिले.’’प्रा. शिंदे यांनी सांगितले, ‘‘स्त्रीला शिक्षण मिळायला सुरुवात झाल्यावर तिने सामाजिक, सांस्कृतिक वारसा जपला. कवितेच्या माध्यमातून स्त्रीला ‘अच्छे दिन’ आले. तिचे हे स्वतंत्र अस्तित्व मोठ्या मनाने समाजाने स्वीकारण्याची गरज आहे.’’डॉ. चव्हाण म्हणाल्या, ‘‘बंड, असमानता हे स्त्रीच्या अनुभवविश्वाचे पदर आहेत. स्त्रियांची संवेदनशीलता, अनुभवविश्व, जाणिवा यामुळे कविता विस्तारते. मात्र, आदिवासी, मुरळी, श्रमिक, शरीरविक्रय करणाऱ्या महिला अशा विविध स्तरांमधील चित्र अद्याप कवितांमधून मोठ्या प्रमाणात मांडले गेलेले नाही. जुन्या, पुरुषप्रधान संस्कृतीला छेद देऊन नवी परंपरा निर्माण करणाऱ्या कविता आता निर्माण होण्याची गरज आहे.’’रोठे यांनी १९७५ नंतरच्या आंतरराष्ट्रीय महिला वर्षानंतर स्त्रीच्या लाजरेपणाला शब्दांचे धुमारे फुटले, असे सांगत अंतर्मनातला कोलाहल व्यक्त करण्याचे कविता हे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. आजची कविता बहुआयामी, चौमुखी आहे, असेही त्या म्हणाल्या.सुषमा करोगल म्हणाल्या, ‘‘लेखकाचे अनुभवविश्व भावनिक, वैचारिक साद-प्रतिसादातून समृद्ध होते. एकसिक विचारप्रणाली कोणत्याही कलाविष्कारात दिसत नाही. पुरुषी मानसिकतेतून स्त्रीकेंद्रित होण्याचे काही प्रयत्न या काळात झाले आहेत.’’ (प्रतिनिधी)