शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

युती कोणी तोडली? ठाकरे-भाजपात जुंपली; राऊत म्हणतात, 'या' नेत्यानं फोन केला होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 12:02 IST

शरद पवारांविषयी तुम्हाला एवढा आदर आहे म्हणून तुम्ही त्यांचा पक्ष फोडला का? असा सवाल राऊतांनी पंतप्रधान मोदींना केला.

मुंबई – शिवसेना-भाजपा युती उद्धव ठाकरेंमुळे तुटली असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एनडीए खासदारांच्या बैठकीत केले. आता या विधानावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. २०१४ मध्ये भाजपानेच युती तोडली होती. तत्कालीन भाजपा नेत्याने तसा फोनही केला होता असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, पंतप्रधान दिशाभूल करत आहेत. २०१४ ची परिस्थिती पंतप्रधान मोदींना आठवायला हवी. २०१४ मध्ये शिवसेनेशी साथ कुणी आणि कशासाठी सोडली? हे अख्ख्या देशाने पाहिलंय. शिवसेना त्यानंतर स्वातंत्र्य निवडणूक लढली. आपली युती तुटली, आपण वेगळे झालोय असं भाजपाकडून अधिकृतपणे एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून सांगितले होते. त्यामुळे शिवसेनेशी साथ कुणी सोडली याबाबत पंतप्रधानांनी जुना रेकॉर्ड तपासून पाहावा असं त्यांनी म्हटलं.

त्याचसोबत शरद पवारांविषयी तुम्हाला एवढा आदर आहे म्हणून तुम्ही त्यांचा पक्ष फोडला का? शरद पवार आणि काँग्रेस यांचे वेगळे राजकारण आहे. लालकृष्ण आडवाणी यांना राष्ट्रपती होण्यापासून पंतप्रधानांनी रोखलं, आडवाणींना राजकीय सन्यास घेण्यासाठी भाग पाडलं असं आम्ही म्हणतो का? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. तसेच काँग्रेस आणि शरद पवार हादेखील त्यांच्यातील अंतर्गत प्रश्न आहे असा टोलाही संजय राऊतांनी भाजपाला लगावला.

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी?

NDA च्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी युतीवरून उद्धव ठाकरेंवर घणाघात केला. आम्ही शिवसेनेसोबत युती तोडली नाही तर त्यांनी तोडली. २०१४ पासून शिवसेना युतीत असूनही त्यांचे मुखपत्र सामनातून सरकारवर टीका करत राहिले. आम्ही एकत्रित निवडणूक लढवल्या आणि जिंकल्याही. जे पक्ष एनडीएत सहभागी होतात त्यांचे स्वागत आहे. आम्हाला एनडीएचा विस्तार करायचा आहे. सत्तेत असतानाही शिवसेना टीका करायची. विनाकारण वाद उकरून काढायची. आम्ही सर्वकाही सहन केले, कमीपणा घेतला, तुम्हाला सत्तेत पण राहायचे आणि टीकाही करायची या दोन्ही एकत्र कशा होऊ शकतात? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला होता.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाShiv Senaशिवसेना