शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
4
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
5
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
6
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
7
भारतानंतर आता दक्षिण आफ्रिकेनेही सुरू केली बांग्लादेशी घुसखोरांविरुद्ध हद्दपारीची मोहीम
8
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
9
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
10
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
11
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
Daily Top 2Weekly Top 5

भगीरथ बियाणी कोण आहे?: ज्यांच्या मृत्यूवरून जितेंद्र आव्हाडांनी केला गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 16:09 IST

बियाणीनं आत्महत्या केली की नाही? मी आजपर्यंत कुणाचे नाव तोंडात काढले नाही तुम्ही माझे नाव काढाल तर मी शांत बसणार नाही असा इशारा आव्हाडांनी दिला. 

ठाणे - कर्जत येथील चिंतन शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाडांनी भगीरथ बियाणी यांच्या नावाचा उल्लेख केला. भगीरथ बियाणीनं आत्महत्या का केली? कुणामुळे केली? २००२ पासून बीडमध्ये जी खुनाची मालिका सुरू झाली त्यामागे कोण असा थेट सवाल आव्हाडांनी उपस्थित केल्यानं अनेक चर्चांना उधाण आले आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, काकाच्या पाठीत सुरा कुणी खुपसला. राजकीय जन्म काकांनीच दिला. तुम्हाला चुलत बहिण नको होती, मग ओवाळायला का जाता? जे ऐश्वर्य मिळाले ते कुणामुळे? भगीरथ बियाणीने आत्महत्या का केली, त्याच्या पोरीला कुणी छळलं, त्यामुळे भगीरथ बियाणीनं आत्महत्या केली की नाही? मी आजपर्यंत कुणाचे नाव तोंडात काढले नाही तुम्ही माझे नाव काढाल तर मी शांत बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला. 

कोण आहे भगीरथ बियाणी?

११ ऑक्टोबर २०२२ रोजी बीडमधील भाजपा पदाधिकारी भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. स्वत:जवळील बंदुकीने बियाणी यांनी डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. बीड शहरातील एमआयडीसी भागातील बियाणी यांच्या राहत्या घरी ही घटना घडली. बियाणी हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. आत्महत्येच्या आदल्या रात्री बियाणींनी आपल्या कुटूंबासमवेत उशिरापर्यंत गप्पा मारल्या. नंतर ते आपल्या खोलीत झोपायला गेले. पहाटेच्या सुमारास उशिरापर्यंत दरवाजा उघउला नसल्याने कुटूंबियाने पाहिले तर बियाणी हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

बियाणी यांना तात्काळ बीड शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल केले परंतु तिथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.बियाणी यांच्याकडून पिस्तूल साफ करताना ट्रिगर दाबून चुकून गोळी झाडली गेली असावी, असा अंदाज वर्तवण्यात आला. भगीरथ बियाणी यांच्या मृत्यूस्थळी सुसाईट नोटही लिहिल्याचे आढळलेले नाही. त्यामुळे बियाणी यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. मात्र जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या दाव्यामुळे आज पुन्हा ही घटना चर्चेत आली आहे. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड