शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

विधानसभेला भाजपाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 17:43 IST

लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीसांकडे मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून पाहिले जात होते. तर खुद्द फडणवीस एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुकीला सामोरे जाणार आहोत असे सांगत होते.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा पराभव झाल्याने दिल्लीतील भाजपश्रेष्ठी नाराज असल्याचे वृत्त आहे. या पराभवानंतर भाजपामहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीला मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्याशिवायच निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलन, शेतकऱ्यांचा बसलेला फटका आदी विषयांवर दिल्लीतील बैठकीत चर्चा झाली. यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा न जाहीर करताच निवडणूक लढविण्याची रणनिती आखण्यात आली आहे. 

लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीसांकडे मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून पाहिले जात होते. तर खुद्द फडणवीस एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुकीला सामोरे जाणार आहोत असे सांगत होते. परंतू लोकसभा निवडणुकीत भाजपा ९ जागांवर आली आणि सगळा पेच फसला आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना याबाबत विचारण्यात आले असता त्यांनी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि सहकारी पक्ष याचा निर्णय घेतील असे ते म्हणाले. परंतू विना चेहराच भाजपा निवडणूक लढविण्याची तयारी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार महाराष्ट्र भाजपाची नियमित कोअर कमिटी किंवा राज्य संसदीय बैठक का घेतली जात नाही, असा प्रश्न राज्यातून बैठकीला गेलेल्या नेत्यांना विचारण्यात आला. तसेच यानंतर कोणीही एकट्याने निर्णय घेताना दिसू नये, अशी ताकीदही देण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, पंकजा मुंडे, मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल आदी उपस्थित होते. 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपाला मागे टाकले आहे. विधानसभेत भाजपाचे 100 पेक्षा जास्त आमदार असूनही लोकसभेला ९ जागा आल्या आहेत. तर काँग्रेसचे अपक्ष विशाल पाटील यांच्या पाठिंब्यासह १४ खासदार आहेत. यामुळे तीन महिन्यांनी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीतही हा फटका बसू नये म्हणून फडणवीसांना मुख्यंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे ठेवण्याची शक्यता कमी झाली आहे.  

टॅग्स :BJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्र