शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

काेरेगाव भीमाची दंगल घडविणारे नेमके कोण, याचा छडा लावणे हेच खरे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 19:26 IST

एल्गार परिषद आणि काेरेगाव भीमा येथील दंगल या दाेन वेगवेगळ्या केसेस असून यातील काेरेगाव भीमा येथील दंगलीबाबतच्या केसकडे दुर्लक्ष झाले आहे.

पुणे : पेरणेफाटा येथे असलेल्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी १ जानेवारीला दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात़ या घटनेला २०० वर्षे झाल्यानिमित्ताने अभिवादन कार्यक्रमांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले़ त्यातून कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी मोठी दंगल झाली़ त्याच्या आदल्या दिवशी पुण्यात शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर रोजी एल्गार परिषद झाली होती़ या एल्गार परिषदेवरुन आता राजकारण खुप तापले आहे. मात्र, त्यामुळे कोरेगाव भीमा येथील दंगल नेमकी कोणी घडविली की घडवून आणली, याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. या दंगलीमागे नेमका कोणाचा हात होता, याचा छडा लावण्याचे सर्वात मोठे आव्हान पुणे ग्रामीण पोलिसांवर पर्यायाने राज्य शासनावर आहे. मात्र, राजकारणात नेमके त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगली संदर्भात शिक्रापूर पोलिसांकडे एकूण २२ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात आतापर्यंत ११४ जण निष्पन्न झाले असून त्यांना अटक करण्यात आली होती. ते सर्व जण आता जामीनावर सुटले आहेत. या गुन्ह्यांपैकी काही गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहेत. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात याबाबत एक स्वतंत्र सेल तयार करण्यात आला होता. या सेलमध्ये असलेल्या दोन्ही पोलीस निरीक्षकांची बदली झाली आहे. त्यामुळे सध्या या सेलचे काम जवळपास ठप्प झाले आहे. या दंगलीत राहुल फटांगडे या तरुणाचा मृत्यु झाला होता. त्यातील आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली होती. तो गुन्हा सध्या तपासासाठी राज्य गुन्हे अन्वेषणकडे तपासासाठी सोपविण्यात आला आहे. 

गृहमंत्री अनिल देशमुख हे गेल्या आठवड्यात पुण्यात आले होते. सहाजिकच एल्गार परिषदेवरुन शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या तपासातील मतभिन्नतेवरुन त्यांना प्रश्न विचारण्यात आले. गेले काही दिवस हा प्रश्न सातत्याने चर्चेला जात असताना गृहमंत्री म्हणून याबाबत अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली असताना तसेच एनआयएकडे एल्गारचा तपास देऊ नये, असा प्रस्ताव तयार करुन तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला होता. असे असताना त्यांना एल्गार आणि कोरेगाव भीमा हे दोन्ही वेगवेगळे गुन्हे आहेत, याची पुरेशी माहिती नसल्याचे समोर आले होते. कोरेगाव भीमाची दंगली ही घडविण्यात आल्याचा आरोप डाव्या पक्षांकडून सातत्याने केला गेला आहे. त्यातूनच मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. कोरेगाव भीमा दंगलीच्या गुन्ह्या मिलिंद एकबोटे यांना अटक करण्यात आली होती.ही दंगल घडविल्याचा आरोप करताना त्यातील अनेक गोष्टी संशयास्पद असल्याचे सांगितले जाते. १ जानेवारी पूर्वी गावातील घरांच्यावर, कमानीवर दगड आणून रचून ठेवले होते. तसेच १ जानेवारीला गावात बंद पाळण्याचे आवाहन करुन संपूर्ण गाव बंद ठेवण्यात आले होते, असे आरोप केले जात आहेत. त्यामागे नेमके कोण आहे, याची माहिती अजूनही पुढे आलेली नाही. 

एल्गार परिषदेत जाणिवपूर्वक तपास वेगळ्या दिशेने व काही जणांना त्रास देण्यासाठी करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, त्याचवेळी दोन वर्षे होऊनही कोरेगाव भीमा दंगलीचा तपास पूर्ण झाला नाही. पोलिसांनी जे आरोपी पकडले, ते सीसीटीव्हीत निष्पन्न झाले होते, त्यांच्यावर कारवाई झाली आहे.मात्र, त्यांना दंगली घडविण्यासाठी कोणी प्रोत्साहित केले, ते तेथे खरंचे आले होते की त्यांना आणले गेले होते, याची माहिती अजूनही पुढे आलेली नाही. यातील २२ गुन्ह्यांपैकी एकाचाही खटला अद्याप सुरु झालेला नाही़ एल्गारमध्ये ज्याप्रमाणे काही लोकांना जाणीवपूर्वक डांबले गेले असले म्हटले जाते. कोरेगाव भीमाची दंगल ही उजव्या विचाराच्या लोकांनी घडविल्याचा आरोपही केला गेला आहे. त्यामुळेच यातील सत्य पुढे येऊ नये, यासाठी हा तपास रेंगाळला गेला आहे का?  ही दंगल खरंच घडविली गेली असेल तर त्यामागील नेमके कोणाचे हात होते, हे सत्य बाहेर आणण्याचे आव्हान ग्रामीण पोलिसांबरोबरच राज्य शासनावर आहे. 

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस