शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

मंत्री कोणाला करावे, हाच एक प्रश्न आहे...

By अतुल चिंचली | Updated: December 8, 2024 07:56 IST

सरकार कोणत्याही पक्षाचे, विचाराचे स्थापन झाले, तरी मंत्री कोणाला करावे? हाच एक प्रश्न सतत छळत राहतो...

- अतुल कुलकर्णी संपादक, मुंबई

प्रिय आमदार मित्रहो,सरकार कोणत्याही पक्षाचे, विचाराचे स्थापन झाले, तरी मंत्री कोणाला करावे? हाच एक प्रश्न सतत छळत राहतो... एका पक्षाचे मुख्यमंत्री असलेले सरकार असो किंवा वेगवेगळ्या पक्षांचे एक मुख्यमंत्री, एक उपमुख्यमंत्री किंवा एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे कसेही सरकार बनले तरी प्रश्न एकच आहे, मंत्री कोणाला करावे... तुमच्या मनातल्या प्रश्नांचा घेतलेला हा वेध -जात बघावी की समाज... की सांभाळावे विभागाचे गणित... 

की झुगारून द्यावीत सगळी बंधनं आणि द्यावे फक्त आणि फक्त गुणवत्तेलाच प्राधान्य? की संधी द्यावी निष्ठावंतांना...? त्यातही पक्षातल्या निष्ठावंतांना, की आपल्यावर निष्ठा ठेवणाऱ्यांना..?जिल्ह्या-जिल्ह्यात पक्ष वाढवण्यासाठी द्यावी संधी आपल्याच पक्षातल्या नेत्यांना..?की गांधीजींवर प्रेम असणाऱ्या आपल्याच नेत्यांना द्यावी मंत्रिपदाची संधी..?गांधींचे फोटो ज्याच्याजवळ जेवढे जास्त तेवढा तो आपल्या कामाचा...या विचारांमुळे दादा..., भाऊ..., साहेब...तिघेही परेशान आहेत बाबूराव... म्हणून तरकोणाला संधी द्यावी हाच एक प्रश्न आहे..?

साहेबांपुढे वेगळेच प्रश्न आहेत...तानाजी सावंत, संजय राठोड, दीपक केसरकरअब्दुल सत्तार यांनाच किती वेळा संधी देता...आम्ही काय सतरंज्याच उचलायच्या का?असा सवाल चार वेळा निवडून आलेले,आपल्यावर निष्ठा ठेवून आपल्या सोबत आलेले,अनेक नेते कळवळून विचारत आहेत...त्यांना काय उत्तर द्यायचे? या विचारात साहेब रात्रभर अस्वस्थ होते...कारण, मंत्री कोणाला करावे..?हाच एक सवाल आहे... जो दिवस-रात्र सगळ्यांना छळतो आहे...

तिकडे दादांचेही असेच झाले आहे...छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे यांना डावलून शिफारस तरी कोणाच्या नावाची करायची? मराठा तितुका मेळवावा... अशी भूमिका घ्यायची की, देवाभाऊसारखी ओबीसींची जबरदस्त मोट बांधायची..?की पदरी पडले पवित्र झाले, असे म्हणत मिळेल ती मंत्रिपदं घ्यायची आणि गपगुमान बसायचे पाच वर्षे विरोध न करता...सारखा एकच प्रश्न छळतो आहे मंत्री कोणाला करावे? हाच तो प्रश्न आहे...

देवाभाऊकडे जाऊन सांगायचे कसे..?लॉबिंग करायचे की स्वतःचे मार्केटिंग...देवाभाऊपुढेही प्रश्न आहेतच...वर्षानुवर्षे मंत्रिपदाची झूल पांघरणाऱ्यांनादूर करून, देऊन टाकावी का संधी नव्या रक्ताला? आणि घ्यावा वसा नवनिर्माणाचा...की, ज्येष्ठांना द्यावे पाठवून सल्लागार मंडळात,आणि नव्यांच्या हाती द्यावी राज्याची दोरी पक्षाचे निष्ठावंत महत्त्वाचे; की आपले...?प्रश्न अनेक आहेत, पण छळणारा प्रश्न एकच आहे यावेळी मंत्री करावे तरी कोणाला..?

की ठेवाव्या मंत्रिपदाच्या काही खुर्च्या रिकाम्या,वर्षानुवर्ष हेच तर करत आले आहेत, सगळे... त्यातली एक खुर्ची तुमच्यासाठीच ठेवली आहे, असे सांगून घ्याव्या काढून पालिका निवडणुका की वाटावीत मन कठोर करूनमहामंडळांची गाजरे नेहमीप्रमाणे राज्यभर... 

कोणी म्हणतील तुम्ही इतके कठोर का झालात..?एका बाजूला आम्ही ज्यांना मोठे केले, तेच आम्हाला विसरून गेले... दुसऱ्या बाजूला आम्ही केलेली मदतही काही जण विसरून गेले...मग अशा विस्कटलेल्या प्रश्नांचे, हे सगळे गाठोडे घेऊन दयाघना प्रश्न सोडवण्यासाठी जायचे तरी कोणाकडे..?कारण या सगळ्याच्या वरही एक प्रश्न छळतोच आहे मंत्री कोणाला करावे? हाच तो प्रश्न आहे...- तुमचाच बाबूराव

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे