शहरं
Join us  
Trending Stories
1
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
2
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाला मविआला इशारा 
3
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
4
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
5
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
6
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
7
पतीसह पिकनिकला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओही बनवले, गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितांची वणवण
8
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
9
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
10
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
11
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
12
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप
13
कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा जनतेला विश्वास
14
सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेल्या अपक्ष आमदाराला महायुती, मविआत प्रवेश बंदी, काय घडलं?
15
IND vs NZ : कॅप्टन Tom Latham ची बॅट तळपली; न्यूझीलंडनं घेतलीये ३०१ धावांची आघाडी
16
दिल्लीत जाताच मविआचा फॉर्म्युला बदलला; ठाकरे सेनेच्या जागा ९० झाल्या, थोरात म्हणाले...
17
काय सांगता? महिन्याला १ लाख रुपये कमवतात भिकारी; स्मार्टफोनसह पॅनकार्डचाही करतात वापर
18
Maharashtra Assembly 2024: मेघना बोर्डीकर विरुद्ध विजय भांबळे; जिंतूरमध्ये राजकीय गणित कसं?
19
पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं; सोनं आलं कुठून? तपास सुरु...
20
Sonu Sood : "आपला देश सुरक्षित"; बॉलिवूडवरील गँगस्टरच्या दहशतीवर सोनू सूद रोखठोक बोलला!

दगड कुणी मारले? पेटवापेटवी करण्यामागे कुणाचा हात?; नितेश राणेंचा ठाकरेंवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2023 4:06 PM

अंबादास दानवे यांचा निकटवर्तीय तो आहे का? रघुनाथ शिंदे आणि अंबादास दानवे यांच्यात गेल्या २ दिवसांपासून काय बोलणे झाले आहे का? असा सवाल नितेश राणेंनी केला.

मुंबई – जालनातील मराठा आंदोलन शांततेत सुरू होते, त्याठिकाणी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक प्रशासन त्यांच्याशी संपर्कात होते. मग त्यावेळी दगडी नेमकी कुणी मारली? मराठा समाजाचे ५८ मोर्चे निघाले, पण कधीही कुणालाही त्रास न देता मोर्चे काढले गेले. रुग्णवाहिकेलाही मोर्चातून वाट दिली जायची. शिस्तप्रिय आणि शांततेने मोर्चा काढणारा आमचा मराठा समाज पोलिसांवर दगडफेक करेल हे मला वाटत नाही. मग ही दगडफेक कुणी केली? असा सवाल भाजपा आमदार नितेश राणे यांनी करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी लावली आहे. त्यात सगळे बाहेर येणारच असा इशारा दिला आहे.

आमदार नितेश राणे म्हणाले की, मराठा समाजाला कुणाला बदनाम करायचे आहे? मराठा आरक्षण हे राणे समितीने दिले. त्याला ताकदीने टिकवण्याचे काम कोर्टात आणि विविध स्तरावर देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठा समाजाला याची जाणीव आहे. विरोधक फडणवीसांना घेरण्याचा प्रयत्न करतायेत. हे विरोधक जेव्हा मविआच्या काळात सरकारमध्ये होते. तेव्हा आरक्षणाची वाट लावण्याचे काम उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारने केले होते. व्यवस्थित वकील द्यायचे नाहीत, प्रेझेंटेशन द्यायचे नाही. मराठा आरक्षणाची केस नाजूक कशी होईल यासाठी उद्धव ठाकरे सरकारने ताकद लावली होती. आज हे आमच्यावर आरोप करत आहेत अशी टीका नितेश राणेंनी महाविकास आघाडीवर केली.

तसेच सामना वृत्तपत्रात मराठा समाजातील माताभगिनींना हिणवण्याचे काम झाले, मूक मोर्चाचे मुका मोर्चा कार्टून छापले ते आमच्यावर टीका करतायेत. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजावर बोलू नये. मराठा आणि ओबीसी समाजात वाद कसा पेटवायचा हे काम मंत्री म्हणून वडेट्टीवार यांनी केले होते. दंगली कुणी पेटवल्या? कुणाल्या दंगली हव्यात? उद्धव ठाकरे, संजय राऊत हे बोलत आहेत. मग जालन्यात झालेल्या दंगलीबाबत तुम्ही बोलत होता का? छत्रपती संभाजीनगरमध्ये काही बसेस पेटवण्यात आल्या. ती माणसे कुणाची होती? रघुनाथ शिंदे कुणाचा माणूस आहे? अंबादास दानवे यांचा निकटवर्तीय तो आहे का? रघुनाथ शिंदे आणि अंबादास दानवे यांच्यात गेल्या २ दिवसांपासून काय बोलणे झाले आहे का? या बसेस पेटल्या त्यामागे अंबादास दानवेंचा हात आहे का याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी नितेश राणेंनी सरकारकडे केली आहे.

दरम्यान, एकाबाजूला सरकारवर टीका करायची दुसरीकडे पेटवापेटवी करायची. महाराष्ट्रातला हिंदू समाज जो एकत्र आलाय तो यांना बघवत नाही. औरंग्याला बाप समजणाऱ्यांची दुकाने बंद व्हायला लागलीत. मुघलांनी हिंदूच्या जातीजातीत भांडणे लावण्याचा प्रयत्न केला. तोच प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते करतायेत. जिहादींच्या दाढी कुरवळणे हे यांचे धंदे आहेत. मराठा, ओबीसी समाजात वाद निर्माण होईल यासाठी प्रयत्न सुरू आहे. कलेक्टर, पोलीस आंदोलनकर्त्यांच्या संपर्कात होते. आंदोलन काल संपणार होते मग दगडी कुणी मारली? आज जे नेते तिथे चाललेत, ज्या मराठा आंदोलकांवर केसेस होतील त्यांच्यामागे उभे राहणार का? ज्यांची चूक नाही त्यांच्यावर केस नाही. मी आंदोलनकर्त्यांशी बोलणार आहोत. मराठा आरक्षणासाठी वर्षोनुवर्षे आम्ही लढतोय. मराठा समाजाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन हिंदू समाजाला टार्गेट केले जात असेल तर महाराष्ट्रात आम्ही खपवून घेणार नाही असा इशाराही आमदार नितेश राणेंनी दिला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणNitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरे