शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
2
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
3
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
4
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
6
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
7
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
8
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
9
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
10
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
11
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
12
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
13
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
14
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
15
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
16
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
17
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
18
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
19
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
20
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी

लाल दिवा मोडीत काढण्याचा निर्णय लोकप्रियतेसाठी का? - उद्धव ठाकरे

By admin | Published: April 21, 2017 9:06 AM

मोदी सरकारच्या लाल दिवे हद्दपार करण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हेतूबद्दल शंका उपस्थित केली आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 21 - मोदी सरकारच्या लाल दिवे हद्दपार करण्याच्या निर्णयाचे समर्थन करताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हेतूबद्दल शंका उपस्थित केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी लाल दिव्याची दुकाने मोडीत काढली आहेत. नोटाबंदीप्रमाणेच हा निर्णय धाडसीच म्हणावा लागेल. 
 
प्रश्न फक्त इतकाच आहे की नोटाबंदीच्या निर्णयाचा देशाला आणि लोकांना नेमका काय फायदा झाला ते कळायला मार्ग नाही. त्याचप्रमाणे लाल दिवा मोडीत काढल्याने देशातील व्हीआयपी संस्कृती खरोखरच नष्ट होणार आहे काय की सवंग लोकप्रियतेसाठी घेतलेला हा निर्णय आहे? असा प्रश्न उद्धव यांनी सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित केला आहे. 
 
जेथे भाजपचे राज्य नाही अशा ठिकाणचे मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांनी लाल दिवा वापरायचाच असा निर्णय घेतला तर तुम्ही काय करणार? असा प्रश्नही अग्रलेखात विचारला आहे. 
 
काय म्हटले आहे अग्रलेखात 
- १ मेपासून लाल दिवा हद्दपार होणार असल्याचे केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आले आहे. देशभरात बोकाळलेल्या ‘व्हीआयपी’ संस्कृतीला चाप लावण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी हा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपतींपासून मंत्र्यांपर्यंत कोणीही लाल दिव्याचा मुकुट मिरवत रस्त्यांवर फिरू शकणार नाही. पंतप्रधानांचा आदेश येताच भाजपशासित राज्यांतील मंत्र्यांमध्ये आपापल्या गाडय़ांवरचे लाल दिवे काढण्याची शर्यतच लागली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही लाल दिव्याचा मळवट पुसून टाकला. त्यामुळे मंत्र्यांनाही लाल दिव्यांना रामराम करावा लागेल. हा निर्णय ऐतिहासिक किंवा क्रांतिकारक वगैरे असल्याचे बँडबाजे वाजायला सुरुवात झाली असली तरी पंतप्रधानांनी लोकांच्या मनातील भावनेचीच एक प्रकारे अंमलबजावणी केल्याचे दिसत आहे.
 
- पंतप्रधानांच्या मनात आले व त्यांनी लाल दिवे विझवण्याचा निर्णय घेऊन टाकला. राजकारणी व नोकरशाहीने लाल दिव्यांच्या बाबतीत एकप्रकारे अतिरेकच चालवला होता. उप जिल्हाधिकाऱयापासून राज्याच्या मुख्य सचिवापर्यंत विविध रंगांच्या दिव्यांची नुसती रंगपंचमीच रस्त्यांवर दिसत असे. महामंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना राज्य मंत्रीपदाचा दर्जा हवा असतो तो फक्त लाल दिव्यासाठीच. लाल दिव्याविषयीची आदरयुक्त भीती त्यामुळे कमी झाली व लाल दिवा हा राजकीय काळय़ा बाजारात मिळणारे साधन ठरले. नाराजांना खूश करायचे असेल तर लाल दिव्याचे एखादे पद देऊन गप्प करायचे हा तर धंदाच बनून गेला होता. पंतप्रधान मोदी यांनी लाल दिव्याची दुकाने मोडीत काढली आहेत. नोटाबंदीप्रमाणेच हा निर्णय धाडसीच म्हणावा लागेल. प्रश्न फक्त इतकाच आहे की नोटाबंदीच्या निर्णयाचा देशाला आणि लोकांना नेमका काय फायदा झाला ते कळायला मार्ग नाही. त्याचप्रमाणे लाल दिवा मोडीत काढल्याने देशातील व्हीआयपी संस्कृती खरोखरच नष्ट होणार आहे काय की सवंग लोकप्रियतेसाठी घेतलेला हा निर्णय आहे? हा प्रश्नही आहेच.
 
- पुन्हा जेथे भाजपचे राज्य नाही अशा ठिकाणचे मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांनी लाल दिवा वापरायचाच असा निर्णय घेतला तर तुम्ही काय करणार? माणूस हा गाडीवरील लाल दिव्याने मोठा ठरत नाही तर कर्तृत्वाने मोठा ठरतो, या मताचे आम्ही आहोत. अनेक बडय़ा पदांवर बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर लाल दिवा आहे. पण देशाला व लोकांना त्यांचा उपयोग शून्यच आहे. अशा लोकांसाठी सत्ता आणि लाल दिवा वांझ ठरतो, मिरवायचे साधन ठरते. शिवसेनाप्रमुखांसारख्या नेत्यांच्या गाडीवर कधीच लाल दिवा नव्हता, पण त्यांचे कर्तृत्व, लोकप्रियता महान होती. लाल दिवा हीच कर्तबगारी असे समजणाऱयांना पंतप्रधानांच्या निर्णयाने नक्कीच धक्का बसला असेल. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.