शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"आरएसएसने त्यांचे कान का टोचले नाहीत, हे उशिरा..."; नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 16:10 IST

औरंगजेब वाद आणि नागपूर हिंसाचाराबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पहिल्यांदाच भूमिका मांडली. या भूमिकेवर काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी टीका केली. 

Nagpur RSS Nana Patole: हिंसाचार समाज स्वास्थासाठी चांगला नाही आणि औरंगजेब हा आजच्या घडीला सुसंगत नाहीये, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मांडली आहे. आरएसएसच्या भूमिकेनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या आहे. आरएसएसची भूमिका आम्ही त्यातले नाही, असे सांगणारी असून, हे उशिरा सूचलेलं शहाणपण आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नाना पटोले यांनी व्यक्त केली. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

औरंगजेबची कबर हटवण्यात यावी म्हणून राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलने आणि निर्देशने करण्यात आली. विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषदेतही याबद्दलची मागणी करण्यात आली. पण, नागपूरमध्ये यावरून हिंसाचार उसळल्यानंतर हा मुद्दा जास्त तापला आहे. या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने प्रथमच भूमिका मांडतांना औरंगजेब आजच्या घडीला सुसंगत नसून, हिंसाचारही समाजाच्या स्वास्थासाठी चांगला नाही, असे स्पष्ट केले. 

संघाची भूमिका उशिरा सूचलेलं शहाणपण -नाना पटोले

नाना पटोले म्हणाले, "घटना झालेली आहे. आरएसएसनेच आणलेलं सरकार आहे. आरएसएसने आणलेल्या सरकारमधील मंत्री धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांचे कान का टोचले नाहीत? महाराष्ट्र पेटल्यानंतर आता आम्ही त्यातले नाही, हे सांगणं चुकीचे आहे. हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे", अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे.  

आरएसएसच्या भूमिकेबद्दल विहिंपची भूमिका काय?

विश्व हिंदू परिषदेचे वरिष्ठ पदाधिकारी गोविंद शेंडे म्हणाले, "औरंगजेब सुसंगत विषय नाही, हे संघाने म्हटलेलं आम्हाला मान्य आहे. पण, औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे आणि त्याचे समर्थन करणे, हे आम्हाला मान्य नाहीये. त्याला आदर्श ठेवणं आम्हाला मान्य नाही."

"आमचं आंदोलन १७ तारखेला होतं. ते संपलेलं आहे. आम्ही पुढची योजना आहे. हे ठरवण्यासाठी भरपूर वेळ आहे. ते ठरल्यानंतर आम्ही सरकारला सांगू", असे गोविंद शेंडे यांनी सांगितले.   

टॅग्स :Aurangzeb Tombऔरंगजेबाची कबरNana Patoleनाना पटोलेRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघCrime Newsगुन्हेगारी