शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
2
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
3
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
4
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
5
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
6
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
7
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
8
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
9
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
10
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
11
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
12
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
13
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
14
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान
15
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
16
अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम 
17
नेत्यांची पावले आंतरवालीत, संभाजीराजेंसह शिंदेसेनेच्या नेत्यांनी घेतली जरांगे यांची भेट
18
...तर हर्षवर्धन पाटील यांची चौकशी करू : मुरलीधर मोहोळ
19
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
20
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!

दोषी अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई का नाही? - हायकोर्ट

By admin | Published: February 03, 2015 1:31 AM

मावळ गोळीबार प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची अद्याप खातेनिहाय कारवाई का झाली नाही, असा सवाल करीत उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य शासनाचे चांगलेच कान उपटले़

मुंबई : मावळ गोळीबार प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची अद्याप खातेनिहाय कारवाई का झाली नाही, असा सवाल करीत उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य शासनाचे चांगलेच कान उपटले़ही घटना होऊन चार वर्षे उलटली आहेत़ यासाठी चार पोलीस अधिकारी दोषी असल्याचे निष्पन्न झाले आहे, असे असताना या अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई न होणे ही गंभीर बाब आहे़ त्यामुळे यासाठी शासनाला दंड ठोठवायचा की नाही, हे पुढील सुनावणीला आम्ही जाहीर करू, असे न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले़या प्रकरणी ईश्वर खंडेलवाल यांनी जनहित याचिका केली आहे़ २०११ मध्ये पवना धरणाच्या पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी गोळीबार केला़ यात काही शेतकऱ्यांचा बळी गेला़ या निर्घृण घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महानगर दंडाधिकारी न्यायालयात तक्रार करण्यात आली़ त्याची दखल घेत न्यायालयाने याच्या चौकशीचे आदेशही दिले़ तरीही कारवाई होत नसल्याने उच्च न्यायालयानेच या कारवाईचे आदेश द्यावेत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली़ याची दखल घेत न्यायालयाने याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश शासनाला दिले़ त्यानंतर या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीश एम़ जी़ गायकवाड यांच्यामार्फत झाली़ पण यासाठी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई झाली नसल्याचे खंडेलवाल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले़ त्यावर संतप्त झालेल्या न्यायालयाने शासनाला चांगलेच फटकारले़ (प्रतिनिधी)