शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

....तर मला अटक का होत नाही : दिग्विजय सिंह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 14:18 IST

एकीकडे आतंकवादी व्यक्तीला भाजप उमेदवारी देते आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगासमोर जाऊन भारत आतंकवादाच्या विरोधात लढत आहेत असे सांगतात, ही कोणती लढाई आहे...

ठळक मुद्देपंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर पुण्यात पत्रकारांशी वार्तालाप ज्या पद्धतीने बाजारात सामान मिळते त्या पद्धतीने लोकप्रतिनिधींना खरेदी केले जात आहे.

पुणे : माझा मोबाईल क्रमांक राज्यसभेच्या वेबसाईटवर आहेत. तो कोणाकडेही असू शकतो. मात्र, पोलिसांना वाटत असेल की आतंकवाद्यांना मिळालेलो आहे तर ते मला अटक का करत नाही असा सवाल काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी पुण्यात केला.

    पुण्यात एल्गार परिषदेच्या तपास प्रकरणी ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे मिळालेल्या चिठ्ठीत दिग्विजय सिंह यांचा क्रमांक आढळला होता. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पुण्यात पत्रकारांशी वार्तालाप केला. पुढे ते म्हणाले की, एकीकडे आतंकवादी व्यक्तीला भाजप उमेदवारी देते आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगासमोर जाऊन भारत आतंकवादाच्या विरोधात लढत आहेत असे सांगतात. ही कोणती लढाई आहे अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीका केली. यावेळी त्यांनी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्यावर उमेदवारीला यावेळी लक्ष केले.ती व्यक्ती नथुराम गोडसेला देशभक्त म्हणते. तुम्ही त्यांना दिलसे माफ नाही करत म्हणतात. पण 56 इंच छातीत किती मोठं हृदय आहे हा प्रश्न आहे. यापुढे ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे जे लोक खुलेपणाने समाजात गोंधळ माजवतात त्यांना ते सोशल मीडियावर फॉलो करतात.गोवा विधानसभेतील घडामोडींवर ते म्हणाले की, भाजपने नोटबंदीत इतका पैसा कमावला आहे, ज्या पद्धतीने बाजारात सामान मिळते त्या पद्धतीने लोकप्रतिनिधींना खरेदी केले जात आहे.त्यांनी सांगितले की, भाजपने उत्तर प्रदेशमध्ये 300 जागा मिळतील असे सांगितले होते तिथेही त्यांचा अंदाज बरोबर आला. 2019च्या लोकसभेबाबतही 300 जागांचा दावा केला होता जो बरोबर ठरला होता. अतिशय आश्चर्यकारक असे त्यांचे अनुमान आहे. जिथे सगळ्यात मोठी लोकशाही आहे, अशा देशात त्यांनी इतक्या बारकाईने भविष्यवाणी केली त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.

यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे पुढीलप्रमाणे-इच्छेने किंवा चुकून बजेटमध्ये तफावत,-बेरोजगाराची समस्या असताना त्याचाही अर्थसंकल्पात उल्लेख नाही.-नरेंद्र मोठी स्वप्नं दाखवतात. 2014साली नागरिकांच्या खात्यात 15 लाख रुपये येतील, बेरोजगारी-5 ट्रीलियन अर्थव्यवस्था करायची असताना विकासदर वाढवणे गरजेचे आहे मात्र स्थिती त्या उलट आहे. त्यामुळे 2024पर्यन्त देशाची अर्थव्यवस्था 5 ट्रीलियन होईल असे वाटत नाही मात्र मोदींना स्वप्न विकता येतात.-पुलवामा हल्ल्यात साडेतीन क्विंटल विस्फोटक होते हे सरकारला कसे माहितीत? जर पूर्वसूचना होती तर सीआरपीएफच्या जवानांना पाठवून जोखीम का उचलली ? तरीही सरकारने कोणालाही जबाबदार धरले नाही.-श्रीलंकेत 44 जवान मारले गेले तेव्हा तिथे अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. भारतात मात्र गुप्तचर यंत्रणांचे अपयश असताना कोणालाही जबाबदार धरले जात नाही. जेव्हा हे आम्ही विचारतो तेव्हा आम्हाला देशद्रोही ठरवले जाते. 

टॅग्स :PuneपुणेDigvijaya Singhदिग्विजय सिंहSadhvi Pragya Singh Thakurसाध्वी प्रज्ञाNarendra Modiनरेंद्र मोदीPoliceपोलिसTerrorismदहशतवाद