शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
6
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
7
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
8
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
9
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
10
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
11
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
12
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
13
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
14
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
15
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
17
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
18
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
19
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
20
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका

खडसेंवर कारवाई का नाही?

By admin | Published: January 18, 2017 6:11 AM

एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध तक्रार करूनही, अद्याप कायदेशीर कारवाई न करण्यात आल्याबाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच सुनावले.

मुंबई : भोसरी येथे एमआयडीसीने संपादित केलेली सुमारे तीन एकर जमीनखरेदीच्या प्रकरणामुळे मंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध तक्रार करूनही, अद्याप कायदेशीर कारवाई न करण्यात आल्याबाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच सुनावले. न्यायालयीन समितीच्या अहवालावर अवलंबून न राहता, आधी राज्य सरकारने तक्रारीवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, असे म्हणत राज्य सरकारला याबाबत एका आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.कोट्यवधी रुपयांचा फायदा मिळण्यासाठी एकनाथ खडसेंनी महसूलमंत्रिपदाचा दुरुपयोग करून, भोसरी एमआयडीसीने संपादित केलेली सुमारे तीन एकर जमीन अवघी तीन कोटी ७५ लाख रुपयांत विकत घेतली. ही जमीन त्यांनी त्यांची पत्नी व जावयाच्या नावावर केली आहे. या व्यवहारामुळे खडसे चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्याविरुद्ध पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करूनही एफआयआर नोंदवण्यात आला नसल्याची बाब याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्या. रणजीत मोरे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणली. त्यावर उच्च न्यायालयाने अद्याप कायदेशीर कारवाई का करण्यात आली नाही? अशी विचारणा सरकारी वकिलांकडे केली. मात्र, सरकारी वकिलांनी या जमीनखरेदी व्यवहाराची चौकशी करण्यासाठी न्यायालयीन समितीची नियुक्ती केली असून, समितीचा अहवाल प्रलंबित असल्याचे खंडपीठाला सांगितले. ‘उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ए. आर. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. या समितीने अहवाल सादर केल्यानंतरच कायदेशीर कारवाईबाबत राज्य सरकार निर्णय घेईल,’ अशी माहिती सरकारी वकिलांनी खंडपीठाला दिली. त्यावर सरकारने याबाबत एकाच आठवड्यात भूमिका स्पष्ट करू, असे खंडपीठाला सांगितले. त्यावर खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी पुढील आठवड्यात ठेवली. याचिकेनुसार, एकनाथ खडसे यांनी भोसरीतील (सर्व्हे क्रमांक ५२/२ अ/ २) विकत घेतलेल्या जमिनीवर एमआयडीसीने ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर अनेक कंपन्यांना दिली आहे. असे असतानाही २८ एप्रिल २०१६ रोजी ही जमीन मंदाकिनी खडसे व खडसे यांचे जावई गिरीश दयाराम चौधरी यांच्या नावावर करण्यात आली. एमआयडीसीची जमीन असतानाही, खरेदी-विक्रीचा व्यवहार मुद्रांक शुल्क विभागाने नोंदवून कसा घेतला नाही? असा सवाल याचिकेद्वारे उपस्थित करण्यात आला आहे. ‘राज्य सरकारने या जमिनीच्या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमली आहे. मात्र, सरकारचा हा निर्णय केवळ सामान्यांच्या डोळ्यात धूळफेक करणारा आहे. या समितीला कोणतेही घटनात्मक अधिकार देण्यात आलेले नाहीत,’ असे याचिकेत म्हटले आहे. (प्रतिनिधी) >तुम्ही तुमचे काम करा- उच्च न्यायालयएफआयआर नोंदवला नसल्याचे वकिलांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणले. ‘समितीच्या अहवालावर अवलंबून न राहाता, सरकारने त्यांचे काम करावे. तक्रारीनुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. समिती त्यांचे काम करेल, तुम्ही तुमचे काम करा,’ अशा शब्दांत खंडपीठाने सरकारचे कान टोचले.