शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
3
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
4
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
5
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
6
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
7
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
8
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
9
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
10
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
11
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
12
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
13
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
14
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
15
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
16
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
17
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
19
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
20
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

पानसरेंना मुंबईला का हलविले?

By admin | Published: September 22, 2015 2:05 AM

प्राणघातक हल्ल्यानंतर कोल्हापुरातील रुग्णालयात उपचार घेत असलेले गोविंद पानसरे यांच्या प्रकृतीमध्ये लक्षणीय सुधारणा होत असतानाही त्यांना अचानक मुंबईला का हलविण्यात आले

कोल्हापूर : प्राणघातक हल्ल्यानंतर कोल्हापुरातील रुग्णालयात उपचार घेत असलेले गोविंद पानसरे यांच्या प्रकृतीमध्ये लक्षणीय सुधारणा होत असतानाही त्यांना अचानक मुंबईला का हलविण्यात आले, असा सवाल माजी पोलीस महानिरीक्षक शमशुद्दीन मुश्रीफ यांनी सोमवारी येथे उपस्थित केला.पानसरे यांच्या खुनानंतरच्या घटनाक्रमाची माहिती देण्यासाठी शहीद गोविंद पानसरे विचार मंचतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुश्रीफ बोलत होते़ यावेळी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी़ जी़ कोळसे-पाटील हे उपस्थित होते.मुश्रीफ म्हणाले, पानसरे यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असताना तत्कालीन जिल्हाधिकारी राजाराम माने आणि जिल्हा शासकीय रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ़ रघुराज थोरात हे पानसरेंना मुंबईत हलविण्यासाठी अ‍ॅस्टर प्रशासनावर सातत्याने दबाव आणत होते, असा आरोपही मुश्रीफ यांनी केला. पानसरे हे अ‍ॅस्टरमध्ये उपचार घेत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १७ फेबु्रवारीला जत (सांगली) दौऱ्यावर होते़ या दौऱ्यावर असतानाही ते पानसरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आले नाहीत़ पानसरे यांचा अंत्यविधी शासकीय इतमामात करण्यात आला नाही किंवा त्यांच्या अंत्यविधीस शासनाचा प्रतिनिधीही उपस्थित नव्हता़, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तपास प्रकरणात राज्यकर्त्यांचा हस्तक्षेप टाळण्यासाठी तपास उच्च न्यायालयाच्या प्रत्यक्ष नियंत्रणाखाली व्हावा , अशी मागणी कोळसे-पाटील यांनी केली़