शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 18:35 IST

Jayant Patil On Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे, अजित पवारांना सोबत घेणार का? या प्रश्नाला जयंत पाटलांनी काय दिले उत्तर?

Jayant Patil Ajit Pawar Maharashtra Election 2024: विधानसभा निवडणुकीचे निकाल कसे लागतील याबद्दल वेगवेगळ्या चर्चा होत आहे. त्यात एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात, अशी चर्चाही सुरू झाली आहे. दुसरीकडे निकालानंतर अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊ शकतात, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या दोन्ही मुद्द्यांवरील चर्चांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर दिले. 

एकनाथ शिंदे-शरद पवार एकत्र येण्याची चर्चा

मुंबई तक या युट्यूब चॅनेलला जयंत पाटील यांनी मुलाखत दिली. एकनाथ शिंदेंसोबत शरद पवार निवडणुकीनंतर आघाडी करू शकतात, असे नवाब मलिक म्हणाले आहेत. याबद्दल बोलताना जयंत पाटील म्हणाले, "एकनाथ शिंदे यांना बरोबर घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. आता महायुती सरकारने सांगायचं आहे की, देवेंद्र फडणवीस युतीचा चेहरा असणार की, एकनाथ शिंदे?", असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

अजित पवारांना शरद पवार पुन्हा सोबत घेणार का?

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवारांना सोबत घेऊन सत्तेत बसण्याची वेळ आली, तर त्यांना घेणार का? असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला होता. 

जयंत पाटील म्हणाले, "दादा (अजित पवार) फार लांब गेलेत आमच्यापासून. लांब गेल्याचं सगळ्या देशाला दिसतंय. ज्या पद्धतीने त्यांनी भूमिका घेतली, आता ते बरेच लांब गेलेत. ते परत येण्याची शक्यता नाही आणि ते परत आमच्याकडे येणार हा प्रश्न आमच्याकडे उद्भवत नाही. आमच्याकडे सगळ्या जागा आता भरल्या गेल्या आहेत", असे उत्तर जयंत पाटलांनी दिले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारJayant Patilजयंत पाटीलMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSharad Pawarशरद पवार