शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

मुंबईतल्या "त्या" शेतकऱ्यांची नावं लवकरच जाहीर करू - मुख्यमंत्री

By admin | Published: July 05, 2017 5:17 PM

मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटरवरून कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या जिल्हानिहाय आकडेवारीत कोणताही घोळ नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 5 - मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटरवरून कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या जिल्हानिहाय आकडेवारीत कोणताही घोळ नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. लवकरच मुंबईतल्या त्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या नावांची यादी सर्वांसमोर ठेवू, असं आश्वासनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. मुंबईतील 813 शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याच्या आकडेवारीचा उल्लेख मुख्यमंत्री कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुंबई शहर जिल्ह्यात 694 शेतकऱ्यांना, तर मुंबई उपनगर जिल्ह्यात 119 शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कर्जमाफी मिळालेल्यांमध्ये मुंबई उपनगरापेक्षा मुंबई शहरातील शेतकरी जास्त आहेत. मुंबई शहरात नक्की कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे, असे प्रश्न आता उपस्थित केले जात होते. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतल्या लाभार्थी शेतक-यांनी नावं जाहीर करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.मुंबई शहर आणि उपनगरातील 1 हजार 704 शेतकऱ्यांवर तब्बल 342 कोटी रुपयांच्या कर्जाची थकबाकी असल्याची धक्कादायक बाब काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. या प्रकरणी आता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईत शेतीच नसताना कृषी कर्ज कसे देण्यात आले, बँकांनी कर्जवाटपाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी ही चलाखी केली नाही ना, असे प्रश्न त्यातून उपस्थित होत आहेत.

(मुंबईतील १७०४ शेतकऱ्यांवर तब्बल ३४२ कोटींचे कर्ज, सरकारही चक्रावले)
राज्यातील किती शेतकऱ्यांकडे दीड लाख रुपयांपेक्षा कमी आणि त्यापेक्षा जास्त कर्जाची थकबाकी आहे याची आकडेवारी राज्यस्तरीय बँकिंग कमिटीने (एसएलबीसी) राज्याच्या सहकार विभागाला दिली आहे, त्यात मुंबई शहरात 1388 शेतकऱ्यांकडे 309 कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे म्हटले आहे. मुंबई उपनगरामध्ये 316 शेतकऱ्यांकडे 33 कोटी 12 लाख रुपयांची थकबाकी आहे. मुंबई उपनगरात दीड लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची संख्या 119 आहे. तर मुंबई शहरात दीड लाख रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची संख्या ही 694 आहे. हे सर्व कर्ज बँक ऑफ इंडिया, देना बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, एचडीएफसी आणि युनियन बँक ऑफ इंडियाने दिलेले आहे. मुंबईबाहेर शेती असलेल्या पण मुंबई निवासी असलेल्या काही शेतकऱ्यांना कर्जे दिली गेली असण्याची शक्यता आहे. काही शेतकऱ्यांनी शेतजमिनीमध्ये गुंतवणुकीसाठी अन्य कारणाखाली कर्जे घेतली का याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. एसएलबीसीने घाईघाईने आकडेवारी दिल्याने काही त्रुटी राहिल्या असल्याचीही शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, मुंबईत शेतकरी आहेत का असा प्रश्न मलादेखील पडला आहे. परंतु कर्जमाफीच्या योजनेच्या लाभार्थ्यांची जी यादी जाहीर करण्यात आली आहे ते प्रस्तावित लाभार्थी आहेत ते सगळेच कर्जमाफीसाठी पात्र आहेत का याची संपूर्ण चौकशी करूनच निर्णय घेतला जाईल. लाभार्थ्यांची जिल्हानिहाय संख्या ही राज्यस्तरीय बँकिंग कमिटीने (एसएलबीसी) दिलेली आहे. त्याची खातरजमा करूनच राज्य शासन दीड लाख रुपयांपर्यंतची थकबाकी माफ करेल, असे सहकार विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.