शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे एकत्र येणार?; शिवसेना मंत्र्यांचं सर्वात मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 10:46 IST

आमच्या चूका तुम्ही माफ केल्या पाहिजेत, तुमची चूक आम्ही माफ केली पाहिजे. जर या तारा जुळल्या तर दोन्ही शिवसेना एकत्र यायला हरकत नाही असं शिरसाटांनी सांगितले.

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एकदा भूकंप होणार अशा चर्चांना उधाण आलं असतानाच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्री संजय शिरसाट यांनी मोठं विधान केले आहे. दोन शिवसेना झाल्या याचं दु:ख आहे. संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार, आता स्थिती इतकीही लांब नाही जी पुन्हा जोडू शकणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. संजय शिरसाट यांनी केलेले विधान आगामी राजकीय भूकंपाचे संकेत तर नाहीत ना असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, आजही माझ्या यातना होतात. आजही कधी उबाठा गटातील पदाधिकारी, आमदार, खासदार भेटतात, त्यांचे आणि आमचे नाते तसेच आहे. परंतु मनात जे अंतर पडलं आहे. तू त्या पक्षात, मी या पक्षात हे आवडत नाही पण त्याला करणार काय..एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघांचे तार जुळले पाहिजे. संधी मिळाली तर मी नक्कीच दोघांना एकत्र करायचा प्रयत्न करेन. ज्यांचं तोंड पाहत नव्हता त्यांच्या तुम्ही मांडीला मांडी लावून बसलात, ती सोडली तर माझ्याकडून १०० चूका झाल्या असतील की नाही, आमच्या चूका तुम्ही माफ केल्या पाहिजेत, तुमची चूक आम्ही माफ केली पाहिजे. जर या तारा जुळल्या तर दोन्ही शिवसेना एकत्र यायला हरकत नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच प्रयत्न एकाबाजूने करून चालत नाही. एकमेकांना अपमानित करून एकत्र आलं पाहिजे असं वाटत असेल तर ते आजच्या घडीला शक्य नाही. राज ठाकरे आणि त्यांनी एकत्र यावे यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. बॅनर्स लावले, उपोषण केले मात्र तरीही झाले नाही. एका कुटुंबातील व्यक्ती ते एकत्र आले नाहीत आम्ही तर फार दूर लोटले गेलोय. हे काही दिवसांचे सोबती आहेत ते जातील असं त्यांना वाटते. परंतु आज काय अवस्था हे पाहतोय. ताकद वाढवायची असेल तर एकत्र यायला हरकत नाही, पण यात पुढाकार कोण घेईल हे माहिती नाही. जर पुढाकार कुणी घेतला, विचारांची एकवाक्यता आली तर त्यात गैर काय राहणार नाही असंही मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.  

दरम्यान, दोन पाऊले मागे जाणे हा त्यावर उपाय आहे. आदित्य ठाकरे हे करू शकत नाही. आदित्यला मागचा इतिहास माहिती नाही. संघर्षाच्या काळात उद्धव ठाकरे होते. जे त्या फळीतले आहेत त्यांनी पुढाकार घेतला तर हे होऊ शकते. आजही आम्ही एकमेकांना भेटतो. विचारपूस करतो परंतु मनात भीती असते, कुणी पाहिले, कुणी बोलले तर...हे अंतर वाढत राहिले तर ते कधी जुळणार नाही. आता जोडायची स्थिती नसली तरी इतकंही लांब नाही की ते जोडू शकणार नाहीत असंही सूचक भाष्य संजय शिरसाट यांनी केले आहे.

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाAaditya Thackerayआदित्य ठाकरे