शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल होणार का? राज्यमंत्री बच्चू कडू म्हणतात की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 21:52 IST

इंदुरीकर महाराजांचे प्रबोधन, प्रचारातून चांगला उपदेश देण्याचं काम करतायेत त्याबद्दल सरकारची भूमिका वाईट आहे असं नाही

ठळक मुद्देथोडी चूक काय केली असेल तर कायदेशीर कारवाई होईलइंदुरीकरांच्या वक्तव्याचं समर्थन नाही, पण त्यांच्या पाठीशी - चंद्रकांत पाटील एखादी चूक असेल ती दुरुस्ती करुन घेणे यात कोणताच कमीपणा नाही - हमीद दाभोळकर

उस्मानाबाद - इंदुरीकर महाराजांच्या गर्भलिंग निदानाच्या वक्तव्यावरुन त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे. मात्र भाषणातील एखाद्या चुकीच्या वक्तव्यावरुन इंदुरीकर महाराजांना टार्गेट करणं बरोबर नाही असं म्हणत भाजपाने या वादात उडी घेतली आहे. 

याबाबत बोलताना राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले की, कायदा हा सगळ्यांसाठीसारखा आहे. महाराजांना २ तासांच्या कीर्तनामध्ये एखादा शब्द चुकीचा निघाला असेल तर कोणी त्याची तक्रार करत असेल तर हा विषय गंभीर आहे, त्यांचा उद्देश काय होता हे तपासलं पाहिजे, नोटीस देणं म्हणजे कायदेशीवर कारवाई होईल असं त्यांनी सांगितले. 

पण त्याचसोबत इंदुरीकर महाराजांचे प्रबोधन, प्रचारातून चांगला उपदेश देण्याचं काम करतायेत त्याबद्दल सरकारची भूमिका वाईट आहे असं नाही, थोडी चूक काय केली असेल तर कायदेशीर कारवाई होईल पण गुन्हा दाखल करेल असं नाही, जी कारवाई असेल ती करु असं सांगत बच्चू कडू यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्यावर राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेणार हे स्पष्ट नाही. 

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, इंदुरीकर महाराजांची दिवसाला 80 प्रवचनं होतात. ती सगळी जनप्रबोधनाची असतात. प्रवचनातून ते शिक्षकांचं आणि पाण्याचं महत्त्व मांडतात. पण त्यांनी महिलांबद्दल असं म्हणायला नको होतं. एक वाक्यानं सगळं माणसांचं गेलं, असं होत नाही. मीसुद्धा इंदुरीकर महाराजांच्या प्रवचनाला जातो. एकदा पाच मिनिटं बसायच्या उद्देशानं गेलो होतो, मी तासभर थांबलो. इतकं मार्मिकपणे ते समाजातल्या चुकांवर बोट ठेवत आहेत. एका चुकीमुळे त्यांचं सगळं गेलं. एका वाक्यामुळे व्यक्ती खराब होत नाही. इंदुरीकरांच्या वक्तव्याचं समर्थन नाही, पण त्यांच्या पाठीशी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. 

तर इंदुरीकर महाराज त्यांच्या कीर्तनामध्ये समाज प्रबोधनाच्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी मांडतात. आणि आपल्यामध्ये एखादी चूक असेल ती दुरुस्ती करुन घेणे यात कोणताच कमीपणा नाही. त्यांनी ही चूक दुरुस्त करुन घ्यावी, यापुढे येणाऱ्या काळात एवढा मोठा समुदाय त्यांचे किर्तन ऐकतो, त्यांना विज्ञान नीट समजून सांगाव, स्त्री-पुरुष समतेचं मुल्य समजून सांगावं. त्यांच्या किर्तनाच्या माध्यमातून अनेक लोकांना गैरसमजातून बाहेर काढण्याची त्यांना संधी मिळाली आही. ही संधी त्यांनी घ्यावी असं आवाहन हमीद दाभोळकरांनी केलं आहे.  

टॅग्स :indurikar maharajइंदुरीकर महाराजBachhu Kaduबच्चू कडूBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटील