शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

पुरोगामी विचारांशी तडजोड करणार नाही; महायुतीत अजित पवारांनी घेतली ठाम भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 8:27 AM

विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही महायुतीसोबत आलोय. अडीच वर्ष शिवसेनेसोबत सरकार बनवणाऱ्यांना तेव्हा धर्मनिरपेक्षता आठवली नव्हती का असा पलटवार अजित पवारांनी टीकाकारांवर केला आहे.

मुंबई - महाराष्ट्रात यंदा होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे. यात अजित पवारांची राष्ट्रवादी शिंदेंची शिवसेना आणि भाजपा एकत्रित मैदानात उतरले आहेत. शिवसेना आणि भाजपाकडून प्रामुख्याने हिंदुत्वाचा मुद्दा जोराने चालवला जातो तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची विचारधारा पुरोगामी आहे. आम्ही आमच्या विचारधारेशी तडजोड करणार नाही अशी ठाम भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे. 

आगामी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेससाठी खूप महत्त्वाची मानली जाते. या निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून आम्ही ६० पेक्षा जास्त जागा लढवणार आहोत. जेव्हा आम्ही महायुतीची चर्चा सुरू केली होती तेव्हाच स्पष्टपणे आमची विचारधारा धर्मनिरपेक्ष आहे आणि त्यावर आम्ही तडजोड करणार नाही असं सांगितले होते. आज आम्हाला प्रश्न विचारले जातात परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी अडीच वर्ष कट्टर हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या शिवसेनेसोबत सरकारमध्ये होती, मीदेखील त्याचा भाग होतो. मग तेव्हा हे प्रश्न विचारले नाहीत. त्यावेळी धर्मनिरपेक्ष विचारधारा आणि पुरोगामी विचार कुठे होते असा पलटवार अजित पवारांनी विरोधकांवर केला आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांनी हे भाष्य केले.

महायुतीकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण?

यावर अजितदादांनी म्हटलं की, आमच्या तिन्ही पक्षाचं सर्वात पहिलं प्राधान्य हे बहुमत मिळवणं हे आहे. त्यानंतर मुख्यमंत्रिपदाबाबत आम्ही विचार करू परंतु मुख्यमंत्री महायुतीचा असेल हे नक्की. इतक्या लवकर आम्ही या गोष्टींचा निर्णय कसा करू शकतो, या गोष्टी निवडणुकीपूर्वी निश्चित होत नाहीत. याआधी अनेक गोष्टीवर विचार करावा लागतो असं सांगत निवडणुकीच्या निकालानंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरवला जाईल असे संकेत त्यांनी दिले आहेत. 

बारामतीतून निवडणूक लढणार?

मी बारामतीत निवडणूक लढणार नाही असं कुठे बोलले नाही. जेव्हा मला पक्षातील कार्यकर्त्यांकडून जयला बारामतीहून विधानसभा निवडणूक लढवण्याची मागणीवर प्रश्न विचारला गेला, तेव्हा मी सांगितले की, ही लोकशाही आहे. अशा मागण्या केल्या जाऊ शकतात. मी त्याठिकाणी ७-८ टर्म आमदार राहिलो आहे. तेव्हापासून या चर्चा सुरू झाल्या. कोण कुठून निवडणूक लढणार हे पार्टी ठरवेल. अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले.

लोकसभेत निराशाजनक कामगिरी का?

लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडून चुकीचा प्रचार करण्यात आला. अबकी बार ४०० पार हा नारा लोकांना आवडला नाही कारण लोकांना वाटलं की, ४०० जागा जिंकल्यानंतर एनडीए सरकार संविधान बदलणार, समान नागरिक संहिता लागू करणार, आरक्षण संपवणार या सर्व गोष्टींचा खूप परिणाम झाला. त्यासोबतच ४०० पार नारा आणि अभियानामुळे आमच्या पक्षातील कार्यकर्ते आपला विजय होतोय हे समजून चिंतामुक्त राहिले. निकाल जरी अपेक्षित नसला तरी आमच्या मतांच्या टक्केवारील फार अंतर राहिले नाही असं अजित पवारांनी सांगितले. 

 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाShiv SenaशिवसेनाHindutvaहिंदुत्व