शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

वाद विकोपाला! स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून रविकांत तुपकर यांची हकालपट्टी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 21:18 IST

रविकांत तुपकर यांनी मीडियातून जे आरोप केलेत तेच पत्रात आहे. तुपकरांनी ज्यांच्यावर आरोप केले ते राजू शेट्टी बैठकीला यायला तयार आहेत मग तुम्ही का टाळताय असा प्रश्न शिस्तपालन समितीने केला आहे.

कोल्हापूर – गेल्या अनेक दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे. संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाला आव्हान दिल्यामुळे हा वाद निर्माण झाला. तुपकर आणि शेट्टी यांच्यातील वाद सुटावेत यासाठी शिस्तपालन समितीकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु रविकांत तुपकर यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची खंत संघटनेच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष जालंधर पाटील यांनी व्यक्त केली आहे.

जालंधर पाटील म्हणाले की, रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्यावर आरोप केलेत. ८ ऑगस्टला शिस्तपालन समितीसमोर म्हणणं मांडावे असं तुपकरांना कळवले होते. या बैठकीला राजू शेट्टी उपस्थित होते. परंतु रविकांत तुपकर आले नाहीत. त्या बैठकीत शिस्तपालन समितीने निर्णय घेणे अपेक्षित होते. परंतु मी स्वत: या बैठकीत निर्णय घेऊ नये, आणखी ८ दिवसांचा कालावधी देऊ. १५ ऑगस्टपर्यंत तुपकरांनी बैठकीला येऊन त्यांनी जे आरोप केलेत त्याचा खुलासा द्यावा असं कळवले होते. पण १५ ऑगस्टला रात्री रविकांत तुपकर यांचे पत्र आले. मी शिस्तपालन समितीचा चेअरमन आहे. पत्र आल्यानंतर परत घाईघाईने निर्णय घेणे चुकीचे होईल असं आम्हाला वाटले. तुपकरांच्या आरोपावर राजू शेट्टी यांनी १९ ऑगस्टपर्यंत खुलासा करावा असं शिस्तपालन समितीने सांगितले आहे.

तसेच सदाभाऊ खोत यांची हकालपट्टी झाली तेव्हा शिस्तपालन समितीचे सदस्य रविकांत तुपकर होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत लोकशाही वापरली जाते. शिस्तपालन समितीच्या बैठकीत रविकांत तुपकर यांनी यायला हवे होते. परंतु ते संघटनेतील वाद राजकीय करायला निघालेत असं वाटते. बैठकीत चर्चा करून संघटनेत एकोपा व्हायला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. संघटनेच्या दृष्टीने चांगला संदेश कार्यकर्त्यांना जायला हवं. वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्षपद तुपकरांना दिले होते. सदाभाऊंना विधान परिषद दिली होती. ज्यांना पदे दिली तेच आरोप करतायेत असंही जालंधर पाटील यांनी म्हटलं.

दरम्यान, आरोप एकांगीने असून चालणार नाही. राजू शेट्टींच्या उत्तराने तुम्ही समाधानी झाला असता. मीडियात फक्त आरोप करतात. फक्त टीआरपीसाठी ४ दिवस माध्यमात बातमी लागेल परंतु त्यानंतर टीआरपी मागे पडेल. आतापर्यंत दोन निवडणुकांमध्ये रविकांत तुपकर हे त्यांची ताकद दाखवू शकले नाहीत त्यामुळे नेमका त्यांच्यामागे जनाधार किती याचा अंदाज आम्ही कसा लावणार. अजूनही आम्ही अतातायीपणा केला नाही. प्रक्षोभक विधाने केली नाही. तुपकरांनी बैठकीला यावं, ते आले नाहीत तर शिस्तपालन समितीला योग्य तो निर्णय घ्यावा लागेल असंही जालंधर पाटील यांनी सांगितले.

चळवळीतील एकसंघपणा कायम ठेवावा

निर्णय प्रक्रियेत आमची माणसे हवी यासाठी संघटनेने आंदोलन केली. प्रत्येक गोष्ट मलाच पाहिजे असं होऊ नये. आंदोलनात कार्यकर्त्यांनी लाठीकाठ्या खाल्ल्या. रविकांत तुपकर यांनी मीडियातून जे आरोप केलेत तेच पत्रात आहे. तुपकरांनी ज्यांच्यावर आरोप केले ते राजू शेट्टी बैठकीला यायला तयार आहेत मग तुम्ही का टाळताय. आम्ही संघटना एकत्र राहावी यासाठी प्रयत्नशील आहोत. राजकारण बाजूला ठेऊन चळवळीतील एकसंघपणा कायम ठेवावा, त्याच्याशी बांधील राहावे असं आवाहनही शिस्तपालन समितीचे अध्यक्ष जालंधर पाटील यांनी केले आहे.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीRavikant Tupkarरविकांत तुपकर