शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
2
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
3
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
4
हिंदू समाजाने स्व-सुरक्षेसाठी संघटित होण्याची गरज: सरसंघचालक मोहन भागवत
5
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
6
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
7
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
8
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
9
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
10
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू
11
डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ
12
मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू
13
लोकसंस्कृतीवरील अडाणीपणाचा शिक्का पुसला; तारा भवाळकर यांनी व्यक्त केली भावना
14
निवडून आलेल्या सरपंच महिलेस पदावरून काढणे सहज घेऊ नका; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
15
इर्शाळवाडी पुनर्वसन; घरांसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधणार? आचारसंहितेपूर्वी वाटप करणार!
16
१९५ एकर जमीन संस्था, आमदारांच्या घरांसाठी; मंत्रिमंडळ बैठकीत येणार मढबाबतचा प्रस्ताव
17
अजित पवार गट पदाधिकारी हत्या प्रकरणात तिघांना अटक; राजकीय वैमनस्यातून काढला काटा
18
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
19
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
20
वायुसेनेच्या एअर शोदरम्यान चेन्नईतील बीचवर चेंगराचेंगरी; ५ मृत्युमुखी, २५० जखमी

२०२४ची लोकसभा निवडणूक लढवणार का? बागेश्वर बाबांचे सूचक विधान, “हिंदू राष्ट्र बनण्यासाठी...”

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2023 11:14 AM

Bageshwar Dham Bageshwar Baba Dhirendra Krishna Shastri: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कोणाची चिठ्ठी निघणार, या प्रश्नावर बागेश्वर बाबांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.

Bageshwar Dham Bageshwar Baba Dhirendra Krishna Shastri: बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री सातत्याने चर्चेत आहेत. बागेश्वर बाबा सध्या देशभरात अनेक ठिकाणी दिव्य दरबार भरवत आहेत. हजारो-लाखो भाविक या दरबारांना उपस्थित राहत आहेत. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये धीरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी मीडियाशी बोलताना बागेश्वर बाबांनी मराठा आरक्षण, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे आव्हान, लोकसभानिवडणूक यासह अन्य विषयांवर स्पष्ट शब्दांत मते मांडली. 

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान तुम्ही स्वीकारत नाही असा आरोप होत आहे, असे विचारले असता धीरेंद्र शास्त्री यांनी सांगितले की, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे आव्हान फक्त माध्यमांमध्ये चर्चेत येण्यासाठी असते. कोणतेही प्रश्न, वादविवाद हे मीडियात बोलून सुटत नाहीत. तुमचे कुठे दुखत असेल तर तुम्हाला डॉक्टरकडे जावे लागते. माझ्याबाबतीत तुम्हाला काही चुकीचे वाटत असले तर तुम्ही मीडियात प्रश्न न मांडता माझ्याकडे या, हेच मी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांना सांगत आहे. मी नागपुरात आलो, मुंबईत आलो; पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्याशी संवाद साधला नाही. मी छत्रपती संभाजीनगरात त्यांना आवाहन करतो, येथे तीन दिवस आहे. काही तुम्हाला खटकत असेल तर तुम्ही माझ्याशी चर्चा करायला या, असे बागेश्वर बाबा यांनी सांगितले. यावेळी बागेश्वर बाबांना सन २०२४ ची लोकसभानिवडणूक लढवण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. 

२०२४ची लोकसभा निवडणूक लढवणार का?

लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत प्रश्न विचारला असता बागेश्वर बाबांनी नकारार्थी उत्तर दिले. निवडणुका लढवून हिंदू राष्ट्राची निर्मिती होऊ शकत नाही. २०१० पर्यंत देशात हिंदू शब्द उच्चारण्याची भीती वाटत होती. आता सनातन धर्माबद्दल चेतना निर्माण झाली आहे. सामाजिक समरसता, विश्वशांती, राष्ट्रभक्ती म्हणजे हिंदू धर्म ही व्याख्या आता देशवासीयांमध्ये रुजली आहे. त्यामुळे आता हिंदूराष्ट्र निर्मितीची मागणी होत आहे, असे बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी म्हटले आहे. तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कोणाची चिठ्ठी निघणार, या प्रश्नावर सावध पवित्रा घेत कोणत्याही बाबांच्या जीवावर राजकारण्यांना निवडणुका जिंकता येणार नाहीत. त्यामुळे विजयाची चिठ्ठी आपण काढत नाही, असे बागेश्वर बाबा यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना, देश गुलामीत होता. त्या कठीण परिस्थितीत ज्या शूरवीरांनी आपली भारतमाता गुलामीतून मुक्त करण्यासाठी मोठा लढा दिला, त्यात सर्वाधिक योगदान मराठा समाजाचे होते. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी बागेश्वर पीठाची मागणी आहे. सरकारला आवाहन करतो की, त्यांनी चर्चा करून मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे, अशा शब्दात धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी मराठा आंदोलनास पाठिंबा दिला. 

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक