शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

व्यापार सुलभीकरणाशिवाय आर्थिक प्रगती अशक्य

By admin | Published: December 29, 2015 2:00 AM

व्यापार करणे सुलभ करण्यासाठी औद्योगिक, बँकिंग, मालवाहतूक आणि करप्रणाली यासंबंधीचे कायदे बदलणे गरजेचे आहे. अन्यथा भारताची आर्थिक प्रगती होणे अशक्य आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान

नागपूर : व्यापार करणे सुलभ करण्यासाठी औद्योगिक, बँकिंग, मालवाहतूक आणि करप्रणाली यासंबंधीचे कायदे बदलणे गरजेचे आहे. अन्यथा भारताची आर्थिक प्रगती होणे अशक्य आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर जनतेच्या आशा वाढल्या आहेत, असे प्रतिपादन न्यूयॉर्कच्या पॅरामाऊंट जेम्सचे संस्थापक पन्नालाल जैन यांनी केले.लोकमतच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांची जैन यांनी लोकमत भवनात पत्नी रजनी यांच्यासह भेट घेतली. त्यावेळी ते लोकमतच्या संपादकीय सहकाऱ्यांशी बोलत होते. खा. दर्डा यांनी जैन दाम्पत्याला बुटीबोरीच्या लोकमत प्रिंटिंग प्रेस संकुलात उभारलेली ‘स्टॅच्यू आॅफ फ्रीडम आॅफ प्रेस’ची प्रतिकृती भेट दिली. मोदींनी सप्टेंबरमध्ये मॅडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये भारतात येणाऱ्यांसाठी ‘व्हिसा आॅन अरायव्हल’ची घोषणा केली. मात्र आजही प्रवाशांना आॅनलाईन अप्लिकेशन करून भारतीय दूतावासाकडून मंजुरी घ्यावी लागते व नंतरच विमानात चढता येते किंवा भारतात पोहोचल्यावर व्हिसा मिळतो. ही घोषणा फसवी असल्याचे जैन म्हणाले. मोदींनी अनिवासी भारतीयांना दुहेरी नागरिकत्व देण्याची घोषणा केली होती. पण, प्रत्यक्षात दुहेरी नागरिकत्व हे भारताने अमेरिकेशी करार केल्याशिवाय शक्य नाही आणि तशी कुठलीच हालचाल सरकारकडून होत नाही. एवढेच नव्हे तर ज्या अनिवासी भारतीयांजवळ अमेरिकेचा पासपोर्ट आहे, त्यांची नाळ भारतापासून तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे, असेही जैन म्हणाले.जागतिक हिरा व्यवसाय दहा अब्ज डॉलरचा मानला जातो. त्यात भारतीय व्यापाऱ्यांचे योगदान ६५ टक्के आहे. विशेषत: काठियावाडी, कच्छी व मारवाडी जैन समाजाच्या मंडळींचे जगभर वर्चस्व आहे, असेही त्यांनी सांगितले. न्यूयॉर्कमधील जैन यांची पॅरामाऊंट जेम्स ही कंपनी अमेरिकेतील व्यापाऱ्यांना पैलू पाडलेल्या हिऱ्यांचा पुरवठा करते. सुट्या हिऱ्यांपेक्षा हिरेजडित आभूषणांना अमेरिकेत जास्त मागणी आहे आणि ती मध्यमवर्गीयांकडून आहे, असे रजनी जैन म्हणाल्या.सहा पिढ्यांपासून व्यवसाय- जैन कुटुंबीय सहा पिढ्यांपासून या व्यवसायात आहेत. जैन यांच्या वडिलांनी १९३० मध्ये हिरे निर्यात सुरू केली. ते पहिले निर्यातदार होते.