शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

स्वच्छतागृहांमध्येही महिलांना ‘दुजाभाव’

By admin | Published: September 20, 2016 1:22 AM

अभिनेत्री विद्या बालनच्या माध्यमातून शासनस्तरावर महिलांमध्ये स्वच्छतागृहांबाबत जनजागृतीचा जागर केला जात आहे.

नम्रता फडणीस/प्रज्ञा केळकर-सिंग,

पुणे : ‘राइट टू पी’ ही चळवळ सोशल मीडियावर जोर धरत आहे. अभिनेत्री विद्या बालनच्या माध्यमातून शासनस्तरावर महिलांमध्ये स्वच्छतागृहांबाबत जनजागृतीचा जागर केला जात आहे. मात्र, प्रत्यक्षात या प्रश्नावर प्रशासनाचीच उदासीनता पुणे शहरात दिसून येत आहे. महानगरपालिकेच्या अखत्यारीतील तुळशीबाग, मंडई परिसरामधील स्वच्छतागृहांमध्ये महिलांनाच जास्त पैसे आकारून दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचे ‘लोकमत’ प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून समोर आले आहे.गेल्या अनेक वर्षांपासून महिलांच्या स्वच्छतागृहांचा प्रश्न चर्चिला जात आहे. शहरातील मोक्याच्या ठिकाणी स्वच्छतागृहांचा अभाव, स्वच्छतागृहांमधील अस्वच्छता अशा गैरसोयींमुळे महिलांना अनेक प्रकारच्या विकारांना सामोरे जावे लागते. गर्दीच्या ठिकाणी असलेल्या सशुल्क स्वच्छतागृहांमध्ये तर महिलांकडून ५ रुपये शुल्काची आकारणी केली जात आहे. पुरुषांना लघवीसाठी मोफत प्रवेश, केवळ संडासला जाण्यासाठी ५ रुपये; तर महिलांना सरसकटच ५ रुपये मोजावे लागत असल्याचे अजब चित्र पाहायला मिळत आहे. महानगरपालिकेच्या नियमांना धाब्यावर बसवून महिलांची राजरोसपणे लूट केली जात आहे.जादा दर आकारणीमुळे बऱ्याच ठिकाणी महिलांचे कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्याचे प्रसंग अनेकदा अनुभवायला मिळतात. मात्र, त्याची ठोस कारणे दिली जात नसल्याने हा प्रश्न कायम अनुत्तरित राहिला आहे. महानगरपालिकेची स्वच्छतागृहे खासगी ठेकेदाराला चालवायला दिल्यामुळे नागरिकांकडून मनमानीपणे शुल्क आकारणी केली जात आहे.>महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, स्त्री आणि पुरुष दोघांकडूनही लघवीसाठी कोणतेही शुल्क आकारता येणार नाही. मात्र, शौचास जाण्यासाठी २ किंवा ५ रुपये आकारणी निश्चित करण्यात आली आहे. मात्र, ठेकेदारांकडून हा नियम फक्त पुरुषांनाच लागू केला जात आहे.महिलांबाबत हा दुजाभाव का, यासंबंधी ठेकेदाराकडे प्रतिनिधींनी विचारणाही केली. त्यावर, ‘आम्हाला वीजबिल, पाणी, स्वच्छता यासाठी जादा खर्च करावा लागतो. त्यामुळे ५ रुपये आकारले जातात’, अशी उत्तरे मिळाली. मात्र, महिलांची लूट का, याचे उत्तर कोणालाही देता आले नाही.>दर आकारणी फलक नाही : मध्यवर्ती भागातील परिस्थितीकोणत्याही स्वच्छतागृहाबाहेर दर आकारणीचे फलक लावणे बंधनकारक असायला हवे. मात्र, कोठेही असे फलक आढळून आलेले नाहीत. त्यामुळे अचानक महिलांकडे ५ रुपये मागितल्यावर त्यांची स्थिती एकदम गोंधळल्यासारखी होते. ‘आधी नाही का सांगायचे’ असे वैतागलेले सूर ऐकायला मिळतात. तुळशीबाग, मंडईसारख्या मध्यवर्ती भागामध्ये महिलांची सातत्याने वर्दळ असते.या परिस्थितीत ही स्वच्छतागृहे त्यांच्यासाठी दिलासा देणारी ठरण्याऐवजी ‘लूट करण्याची जागा’ ठरत आहेत. त्यामुळे, पैसे वाचवण्याच्या नादात अनेकदा महिला स्वच्छतागृहात जात नाहीत. मूत्र रोखून धरल्याने मूत्राशयाचे, पोटाचे, किडनीचे, गर्भाशयाचे विकार उद्भवण्याची शक्यता असते. ही परिस्थिती पाहता, मनमानी करणाऱ्या ठेकेदारांवर महानगरपालिकेने कडक कारवाई करावी, अशी मागणी महिलांकडून केली जात आहे.>हाच अनुभव मंडई परिसरातील दोन स्वच्छतागृहांमध्ये आला. ‘आम्हाला पाणी विकत घ्यावे लागते. त्यामुळे आम्ही जास्त पैसे घेतो’, असे उत्तर मंडईतील माणसाने दिले. पण, केवळ महिलांकडूनच जास्त पैसे का, याचे उत्तर कोणालाही देता आले नाही. एका स्वच्छतागृहातील व्यक्तीने तर मुजोरी करत ‘तुम्हाला कोणाकडे तक्रार करायची तर करा, माझे नाव लिहून घ्या’ असे उत्तर दिले. ‘वाद घालण्यापेक्षा कमी पैसे द्या’, अशी भूमिकाही एकाने घेतली.>स्थळ : तुळशीबागवेळ : दुपारी ४ वाजतामहिला स्वच्छतागृहात प्रवेश करतानाच कर्मचाऱ्याचे हटकणे.मॅडम, ५ रुपये द्यामहिला : कसले? सगळीकडे तर २ रुपयेच घेतात.मुलगा : कोण म्हणाले? या परिसरात सगळीकडे ५ रुपयेच घेतले जातात.महिला : मग पुरुषांना किती?मुलगा : त्यांना लघवीला जायचे असेल तर मोफत प्रवेश. केवळ, संडासला जायचे असेल तर ५ रुपये.महिला : ते तुम्ही कसे ओळखणार?मुलगा : मॅडम, वाद नको. ५ रुपये द्यावेच लागतील.महिला : महिलांनीच जास्त पैसे का द्यायचे? मुलगा : (अरेरावीने) ते आमच्या ठेकेदाराला विचारा आणि आत्ता पैसे द्या.>हुज्जत घालूनही नाही फायदा....हुज्जत घालूनही काही फायदा झाला नाही. पैसे द्यावेच लागले. त्यातून इतर महिलांनीही ‘जाऊ द्या हो, एकदाच तर जायचंय’ असे म्हणत अंग काढून घेतले. पण ‘आपण जादा पैसे का द्यायचे’ याची जाणीव एकाही महिलेला झाली नाही, हे विशेष.