शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
4
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
5
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
6
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
7
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
8
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
9
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
10
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
11
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
12
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
13
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
14
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
15
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
16
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
17
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
18
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
19
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
20
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड

महिलांना मंदिरात प्रवेश द्यावा लागेल

By admin | Published: March 31, 2016 3:43 AM

प्रार्थनास्थळामध्ये महिलांच्या प्रवेशास मज्जाव करणारा कोणताही कायदा नाही आणि मंदिरात पुरुषांना प्रवेश दिला जात असेल तर महिलांनाही दिला जायला हवा, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी

मुंबई : प्रार्थनास्थळामध्ये महिलांच्या प्रवेशास मज्जाव करणारा कोणताही कायदा नाही आणि मंदिरात पुरुषांना प्रवेश दिला जात असेल तर महिलांनाही दिला जायला हवा, असे मत मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी व्यक्त केले. त्याचबरोबर कोणालाही मंदिरात प्रवेशबंदी करणाऱ्यास सहा महिने तुरुंगात धाडण्याचा कायदा महाराष्ट्रात अस्तित्वात आहे, याकडेही न्यायालयाने लक्ष वेधले.अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर मंदिरात महिलांच्या प्रवेशबंदीच्या विरोधात अ‍ॅड. नीलिमा वर्तक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. विद्या बाळ यांनी केलेल्या जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने हे मत व्यक्त केले.सरकारी वकील अभिनंदन वाग्यानी यांनी माहिती घ्यावी व शनी शिंगणापूर मंदिरात महिलांना प्रवेश मिळेल याची खात्री राज्य सरकार देणार का याविषयी येत्या शुक्रवारी (१ एप्रिल) निवेदन करावे, असे निर्देश मुख्य न्यायाधीश न्या. धीरेंद्र वाघेला व न्या. एम.एस. सोनक यांच्या खंडपीठाने दिले. त्यामुळे आता महिलांना शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर प्रवेश देण्याचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात आला आहे. पुरुषांच्या बरोबरीने महिलांनाही प्रार्थनास्थळांमध्ये प्रवेश देण्याची गरज स्पष्ट करताना मुख्य न्यायाधीश सरकारला उद्देशून म्हणाले की, कोणालाही मंदिरांमध्ये प्रवेशबंदी निषिद्ध ठरविणारा ‘महाराष्ट्र हिंदू प्लेस आॅफ वर्शिप (एन्ट्री आॅथोरायझेशन) अ‍ॅक्ट, १९५६’ हा कायदा तुम्हीच केला आहे. या कायद्यानुसार मंदिरात प्रवेश नाकारणाऱ्यास सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा आहे. न्यायालयाने असे म्हटले की, तुमचाच कायदा आहे, त्याची अंमलबजावणी करा. या कायद्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊन सर्वसामान्य लोकांना त्यातील तरतुदींची माहिती करून द्या.महिलांना प्रार्थनास्थळांमध्ये बंदी घालणारा कायदाच अस्तित्वात नाही. जर पुरुषांना प्रवेश देत असाल तर महिलांनाही प्रवेश द्यायलाच पाहिजे. गाभाऱ्यात जाऊन देवाची पूजा केली जाते. मग महिलांना बाहेर कसे ठेवता? त्यामुळे एखादी महिला गाभाऱ्यात जाऊन पूजा करत असेल तर सरकारने तिला बाहेर काढण्याऐवजी तिला संरक्षण द्यायला हवे, असेही मुख्य न्यायाधीशांनी बजावले. देवाच्या पावित्र्यााविषयी सरकारला चिंता वाटत असेल तर तसे सांगा, असेही न्यायालयाने म्हटले आहे.महिलांना शनी शिंगणापूरमध्ये प्रवेश मिळावा यासाठी ‘भूमाता ब्रिगेड’च्या तृप्ती देसाई यांनी आंदोलन केले. त्यानंतर न्यायालयात ही याचिका केली गेली आहे. महिलांची प्रवेशबंदी मनमानी, बेकायदा असून समानतेच्या मूलभूत हक्काची पायमल्ली करणारी आहे, असे याचिकाकर्त्यांचे प्रतिपादन आहे. महिलांना केवळ मंदिरातच नव्हे तर गर्भगृहातही प्रवेश मिळायला हवा, अशी त्यांची मागणी आहे. (प्रतिनिधी)आंदोलनास बळ मिळाले!उच्च न्यायालयाने व्यक्त केलेल्या मतामुळे महिलांच्या मंदिरप्रवेशाच्या आंदोलनाला एकप्रकारे बळ मिळाले आहे, असे एक याचिकाकर्र्त्या विद्या बाळ यांनी म्हटले आहे. डॉ. बाळ म्हणाल्या की, महाराष्ट्रात मंदिरातील कोणाचीही प्रवेशबंदी निषिद्ध ठरविणारा कायदा १९५६ पासून आहे. तरीही निरर्थक चर्चा घडत आहेत. नव्याने कायदा करण्यापेक्षा या कायद्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. न्यायालयाने याचिका तातडीने सुनावणीस घेतली हे स्वागतार्ह आहे. मुळात कुठल्याही राजकीय पक्षाने धर्मनिरपेक्षता मान्य केलेली नाही. देवस्थानची सावध भूमिकान्यायालयाच्या या मताबाबत शिंगणापुरातून सावध भूमिका व्यक्त करण्यात आली आहे. शनिदेवाच्या मंदिरात महिलांना प्रवेश असून चौथऱ्यावरील प्रवेशाबाबत न्यायालयाने भाष्य केलेले नाही. त्यामुळे सरकार न्यायालयात काय निवेदन करते ते पाहून पुढील दिशा ठरेल, असे देवस्थानचे साहाय्यक कार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले यांनी सांगितले. कोर्टाचा लेखी आदेश पाहिल्याशिवाय याबाबत आपणाला मतप्रदर्शन करता येणार नाही, असे देवस्थानच्या अध्यक्षा अनिता शेटे यांनी सांगितले. शिंगणापूरचे सरपंच बाळासाहेब बानकर यांनी स्त्री आणि पुरुष असा कुठलाही भेदभाव येथील मंदिरात नाही, मात्र चौथऱ्याबाबत ग्रामस्थांची वेगळी भूमिका असल्याचे ते म्हणाले. मात्र, शिंगणापूर देवस्थान बचाव कृती समितीचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी विरोधी सूर कायम ठेवला.