शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

राजू पाटील महायुती सरकारवर कडाडले! म्हणाले, "स्त्रिया हातात शस्त्र घेऊन..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 12:00 PM

Raju Patil MNS: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचे महाराष्ट्राच्या राजकारणातही पडसाद उमटले आहेत. विरोधकांकडून महायुती सरकारला लक्ष्य केले जात असून, आता मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे.

Raju Patil Badlapur Sexual Abuse: बदलापूर येथील शाळेत दोन बालिकांवर झालेल्या अत्याचारावरून मनसे आमदार राजू पाटील यांनी महायुती सरकारवर टीकेचे बाण डागले आहेत. महिला सुरक्षेच्या मुद्द्यासह इतर काही विषयांवर बोट ठेवत आमदार राजू पाटील यांनी एक कविता पोस्ट केली आहे.   

कवी पुष्यमित्र उपाध्याय यांची कविता सोशल मीडियावर पोस्ट करताना आमदार राजू पाटील यांनी सरकारला सुनावले आहे. 

सरकारला जाग आली नाही, तर...; राजू पाटील काय म्हणाले?

आमदार राजू पाटील यांनी म्हटले आहे की, "राज्यकर्त्यांचा भोंगळ कारभार, महिलांना सुरक्षितता देण्यासाठीची अपुरी राजकीय इच्छाशक्ती आणि त्यामुळे जनतेची होणारी ससेहोलपट महाराष्ट्रात धगधगत्या ज्वालामुखीचं रूप घेत आहे. अजूनही सरकारला जाग आली नाही, तर मूक आक्रोश करणाऱ्या स्त्रिया हातात शस्त्र घेऊन मैदानात उतरल्याशिवाय राहणार नाहीत."

राजू पाटील यांनी शेअर केलेली 'ती' कविता

छोडो मेहँदी खडक संभालोखुद ही अपना चीर बचा लोद्यूत बिछाये बैठे शकुनिमस्तक सब बिक जायेंगेसुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयेंगे

कब तक आस लगाओगी तुमबिक़े हुए अखबारों से,कैसी रक्षा मांग रही होदुशासन दरबारों से|

स्वयं जो लज्जा हीन पड़े हैंवे क्या लाज बचायेंगेसुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयंगे|

कल तक केवल अँधा राजाअब गूंगा बहरा भी हैहोठ सी दिए हैं जनता के,कानों पर पहरा भी है|

तुम ही कहो ये अश्रु तुम्हारेकिसको क्या समझायेंगे?सुनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयंगे|

मोदींनी व्यक्त केली चिंता, हलगर्जीपणा करणाऱ्यांना इशारा

महाराष्ट्र दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. "मी देशातील प्रत्येक राजकीय पक्षांना, राज्यातील सरकारांना आवाहन करतो की, महिलांवरील हिंसा अक्षम्य पाप आहे; दोषी कुणीही असो, तो वाचता कामा नये. त्याला कोणत्याही स्वरुपाची मदत करणारे सुटता सुटायला नको", असे मोदी म्हणाले होते.  

"रुग्णालये असो, शाळा असो, कार्यालये असो वा पोलीस प्रशासन, ज्या पातळीवर कामचुकारपणा होईल, त्या सगळ्यांचा हिशोब व्हायला हवा. वरपासून खालपर्यंत स्पष्ट मेसेज जायला पाहिजे. हे खूप अक्षम्य आहे. सरकार येतील आणि जातील. पण, जीवनाची आणि महिलेच्या सन्मानाचे रक्षण, हे समाज आणि सरकारच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे", असे भाष्य पंतप्रधान मोदींनी केले होते.

टॅग्स :thaneठाणेMaharashtraमहाराष्ट्रRaju Patilराजू पाटीलMNSमनसेbadlapurबदलापूरMahayutiमहायुती