शहरं
Join us  
Trending Stories
1
रिकाम्या खुर्च्या अन् वाट बघत बसलेल्या ममता...; डॉक्टरांच्या बहिष्कारावर म्हणाल्या, मी राजीनामा द्यायला तयार!
2
राहुल गांधींना प्रश्न विचारायला आम्ही तुमचे नोकर आहे का?; जरांगे पाटलांचा प्रसाद लाड यांना सवाल
3
“सरन्यायाधीशांनी पंतप्रधानांना घरी बोलावले असेल तर चूकच”; वकिलांनी थेट कायदाच सांगितला
4
पॅरालिम्पिक चॅम्पियनसाठी कायपण! चक्क जमिनीवर मांडी घालून बसले PM मोदीजी
5
LAC वरून केव्हा हटणार चिनी आरमी? जयशंकर म्हणाले, 75% वाद मिटले, पण 'हा' एक मुद्दा अद्यापही कायम
6
“गद्दारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा CM व्हावे”; ठाकरे गटातील नेत्याची मन की बात
7
अमोल कोल्हेंचा फोटो बॅनरवर कसा?; अजित पवारांनी सांगितले कारण, काय काय बोलले?
8
स्टार क्रिकेटरची फिल्मी लव्ह स्टोरी... पहिल्या भेटीत प्रेमात पडला पण लग्न करायला घेतली ५ वर्ष
9
“आधीचे PM इफ्तार पार्टी ठेवायचे, CJI जायचे; गणपतीला गेल्यावर इतका गहजब का?”: फडणवीस
10
भ्रष्टाचार की महागाई म्हणावे...! ७ वर्षांपूर्वी ४२ कोटींना उड्डाणपूल बांधला, आता तोडायला ५२ कोटी खर्च
11
शरद पवारांची भेट का घेतली? राजकीय चर्चा झाली का? भाजपच्या संजयकाकांनी सगळंच सांगितलं
12
Shams Mulani ला शतकी डाव साधण्याची संधी! अय्यरचा संघ त्याला रोखणार?
13
देशातील सर्वात श्रीमंत महिलेचा भाजपला रामराम; उमेदवारी न दिल्याने भरला अपक्ष अर्ज
14
“२ महिन्यांत आमचे सरकार, लाडकी बहीण योजनेत ३ हजार रुपये देणार”; राऊतांनी दिली गॅरंटी
15
'मराठ्याची लेक म्हणून उपोषणाला बसले'; भाजपशी निगडीत आरोपांवर राजश्री उंबरे म्हणाल्या...
16
खळबळजनक! महिलेचा हायवेवर सापडला निर्वस्त्र अन् शीर नसलेला मृतदेह
17
टीम इंडिया सलग तिसऱ्यांदा WTC फायनल खेळणार? ICC ने दिली महत्त्वाची अपडेट
18
"आत्राम साहेब मुलीला नदीत फेकावे वाटले, मग अजितदादांना कुठे ..."; शरद पवार गटातील नेत्याचा हल्लाबोल
19
माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचे निधन; दिल्लीत एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास
20
स्मॉलकॅप शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा; LIC चाही मोठा डाव!

"महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा", महिला काँग्रेसची मागी   

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 6:45 PM

Maharashtra Women's Congress News: गुन्हेगारांवरच अंकुश राहिला नसल्याने राज्यातील परिस्थीती बिकट बनली आहे. महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी केली आहे.

मुंबई - राज्याला एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री असूनही ते महिलांना न्याय देऊ शकत नाहीत. राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे, यातून लहान मुलीही सुटलेल्या नाहीत. गुन्हेगारांवरच अंकुश राहिला नसल्याने राज्यातील परिस्थीती बिकट बनली आहे. महिलांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरलेल्या मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी केली आहे.

टिळक भवनमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना संध्या सव्वालाखे यांनी महायुती सरकारवर तोफ डागली. त्या पुढे म्हणाल्या की, बदलापूरमध्ये तीन, साडेतीन वर्षांच्या दोन मुलींवर अत्याचाराच्या घटनेने माणुसकीला काळीमा फासला आहे. गुन्हा नोंदवण्यासाठी पीडित मुलीच्या आईला पोलीस स्टेशनमध्ये १२ तास बसवून ठेवले, पोलिस दबावाखाली होते असे स्पष्ट दिसते. ज्या शाळेत हा गुन्हा घडला त्या शाळेतील संबंधित लोकांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करावा. घटना १२ तारखेला घडली व १५ तारखेला मुख्यमंत्री एका कार्यक्रमासाठी बदलापुरात होते पण त्यांच्यापर्यंत ही माहिती का पोहचली नाही. राज्यातील महिला अत्याचाराच्या एका घटनेत तपास करून दोन महिन्यात आरोपीला फाशी दिली, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी काल एका कार्यक्रमात सांगितले. ही घटना कोणती व कोणाला फाशी दिली त्याचा खुलासा करावा व बदलापूरच्या नराधमालाही तातडीने फाशी द्यावी, असेही सव्वालाखे म्हणाल्या.

महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बदलापूरमध्ये झालेल्या लहान मुलींवरील अत्याचाराची माहिती घेतली व पोलीस स्टेशनला भेटून तात्काळ कारवाई करण्याची मागणी केल्याची माहिती सव्वासाखे यांनी दिली. बदलापूरच्या घटनेने देश हादरला, पण राज्य महिला आयोगाने तीन-चार दिवस या घटनेची दखलही घेतली नाही, त्या कुठे होत्या. हे काम बाल हक्क आयोगाचे आहे माझे नाही, असे उद्धट उत्तर त्यांनी दिले, अशा बेजबाबदार व निष्क्रीय व्यक्तीने पदाचा राजीनामा द्यावा. भाजपाच्या चित्रा वाघ यांनीही बदलापूरच्या लहान मुलीबद्दल एक शब्दही काढला नाही उलट कोलकात्याच्या घटनेवर त्या बोलत आहेत. बदलापूरच्या माजी नगराध्यक्षाने एका महिला पत्रकाराला अश्लील भाषा वापरली, या महिला पत्रकाराचा दोन दिवस गुन्हा नोंद करुन घेतला नाही, या माजी नगराध्यक्षला अटक करा अशी मागणीही सव्वालाखे यांनी केली.

बदलापूरसारख्याच घटना अकोला, नाशिक, ठाणे जिल्ह्यात घडल्या आहेत. राज्यातील महिला अत्याचाराच्या वाढत्या घटना व निष्क्रीय सरकार लक्षात घेऊन प्रदेश महिला काँग्रेस प्रत्येक जिल्ह्यात नारी न्याय समिती स्थापन करणार आहे. या समितीत एक महिला वकील व पाच महिला सदस्य असतील, पीडित महिलांना सर्व प्रकारची मदत तसेच समुपदेशन करण्याचे काम ही समिती करेल, अशी माहिती संध्या सव्वालाखे यांनी दिली आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMahayutiमहायुतीEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार