शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

वैद्यनाथाच्या पिंंडीवरील आवरण काढण्यासाठी महिलांचे आंदोलन

By admin | Published: July 05, 2016 1:50 AM

श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा फेरा देवालाही चुकला नाही. पाऊस पडावा म्हणून एरवी देवाकडे करुणा भाकणारे भाविक जेव्हा ज्योतिर्लिंगावरच्या चांदीवर दुष्काळाचे खापर फोडतात, तेव्हा त्याला

परळी : श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा फेरा देवालाही चुकला नाही. पाऊस पडावा म्हणून एरवी देवाकडे करुणा भाकणारे भाविक जेव्हा ज्योतिर्लिंगावरच्या चांदीवर दुष्काळाचे खापर फोडतात, तेव्हा त्याला काय म्हणावे? वैद्यनाथांच्या पिंंडीवरील चांदीच्या आवरणामुळे सध्या पाऊस पडत नाही. त्यामुळे हे आवरणच काढून टाकावे, या मागणीसाठी सोमवारी महिला आक्रमक झाल्या होत्या.देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या पिंडीची झीज थांबविण्यासाठी देवस्थान ट्र्स्टने २०११पासून हे चांदीचे आवरण चढविलेले आहे. हे आवरण काढून टाकावे, अशी मागणी करणारे निवेदन श्री प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग विकास कृती समितीच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले. आवरणामुळे पाऊस पडत नसल्याची महिलांची धारणा आहे. याच मागणीसाठी सोमवारी शांता राठोड यांच्यासह १३ महिला सकाळी ६ वाजता गाभाऱ्यात पोहचल्या. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवले. त्यानंतर मंदिर परिसरात त्यांनी ठिय्या दिला. परळी शहर पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. त्यामुळे तणाव निवळला. (प्रतिनिधी)चांदीचे आवरण कशासाठी?श्री वैद्यनाथाला अभिषेक करीत असताना भक्त मोठ्या श्रद्धेने पंचामृत (दही-दूध-तूप-मध-साखर), हळद-कुंकू, गुलाल बुक्का, अक्षता, अत्तर, केळी, आंबा हीफळे आणि जल या वस्तूंचा वापर यात होतो. आम्लीय पदार्थांच्या गुणधर्मामुळे मूर्तीवर परिणाम होऊन झीज होत असते. ही बाब ट्रस्टच्या लक्षात आल्यानंतरयावर उपाययोजना म्हणून २०११मध्ये चांदीचे आवरण घालून स्पर्शदर्शन अबाधित ठेवले आहे. जगद्गुरूंनीही केले कौतुककाशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर महास्वामी, श्रीशैल्य जगद्गुरु महास्वामी, उज्जैनपीठाचे जगद्गुरू सिध्दलिंंगराज देशीकेंद्र महास्वामी, करवीरपीठाचे शंकराचार्य, राजस्थानचे राधाकृष्ण महाराज यांच्यासह देशातील विविध पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पर्श दर्शन अबाधित ठेवून आवरण केल्याबद्दल व देवाची झीज होऊ नये म्हणून घेतलेल्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केल्याचे ट्रस्टीच्या वतीने निवेदनात म्हटले आहे.चांदीचे आवरण व पावसाचा दुरान्वये संबंध नाही. पाऊस नसण्यामागची शास्त्रीय कारणे वेगळी आहेत. त्याचा पिंडीवरच्या आवरणाशी संबंध जोडता येणार नाही. आवरण असावे की नसावे, हा श्रद्धेचा व ट्र्स्टसंबंधित प्रश्न आहे; परंतु पाऊस कमी असणे किंवा नसण्यामागची नेमकी कारणे आपण लक्षात घेतली पाहिजेत.- प्राचार्या सविता शेटे, राज्य सचिव, राष्ट्रीय अनुसंधान